स्वातंत्र्यदिनी मांसाहार विक्री बंदीवरून आदित्य आणि जितेंद्र आव्हाडांची पुराव्यासकट भाजपने केली बोलती बंद!

तेव्हा जिभेवर कुलूप, तोंड उघडण्यापूर्वी निर्णय वाचून घ्या; भाजप नेते नवनाथ बन यांचे आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर


मुंबई: स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी चिकन-मटण विक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या काही महानगरपालिकांच्या आदेशावरून राज्यात राजकारण तापले आहे. या निर्णयावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. आता या टीकेला भाजप नेते नवनाथ बन यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. बन यांनी म्हटले आहे की, हा निर्णय आजचा नाही, तर १२ मे १९८८ रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारनेच घेतला होता आणि तेव्हापासून तो लागू आहे. त्यामुळे या निर्णयावर टीका करण्यापूर्वी आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी इतिहास तपासावा.



'मांसाहार बंदी'चा जुना निर्णय आणि भाजपची भूमिका


नवनाथ बन यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट करून म्हटले की, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती, रामनवमी आणि महावीर जयंती अशा राष्ट्रीय आणि धार्मिक महत्त्वाच्या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्याचा अधिकार महापालिकांना आहे. हा निर्णय स्थानिक लोकप्रतिनिधींच्या ठरावानुसार घेतला जातो. विशेष म्हणजे, महाविकास आघाडी सरकारच्या काळातही हाच निर्णय कायम ठेवण्यात आला होता, पण तेव्हा या नेत्यांच्या तोंडावर कुलूप होते, अशी खोचक टीका बन यांनी केली आहे. आता मात्र राजकारणासाठी ते 'अत्याचार' सुरू असल्याचा कांगावा करत आहेत. 'तोंड उघडण्यापूर्वी किमान जुना निर्णय वाचून घ्या,' असा सल्लाही त्यांनी दिला.





उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका


या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपली भूमिका मांडली. 'कोणी काय खावे किंवा खाऊ नये, यावर बंदी घालणे योग्य नाही,' असे ते म्हणाले. काही धार्मिक प्रसंगी, जसे की आषाढी एकादशी किंवा महावीर जयंती, अशी बंदी घातली जाते तेव्हा लोक समजू शकतात. पण १५ ऑगस्टला अशी बंदी घालणे महाराष्ट्रात योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. या प्रकरणात सविस्तर माहिती घेणार असल्याचेही त्यांनी माध्यमांना सांगितले.



विविध शहरांमध्ये बंदीचे आदेश


मालेगाव महानगरपालिकेने १५, २० आणि २७ ऑगस्ट रोजी सर्व खासगी कत्तलखाने आणि मांसाहार विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये श्रीकृष्ण जयंती (२० ऑगस्ट) आणि जैन पर्युषण पर्व तसेच गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट) या दिवसांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे राज्यातील बहुतेक सर्व महापालिकांनीही १५ ऑगस्ट रोजी सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Comments
Add Comment

मुंबईतील सर्वसामान्य प्रवर्गाचे प्रभाग कोणते आहेत, जाणून घ्या

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सन २०२५च्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण सोडत मंगळवारी ११

मुंबईत ओबीसी प्रभाग कोणते आहेत, जाणून घ्या

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सन २०२५च्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण सोडत मंगळवारी ११

मुंबईत अनुसूचित जाती आणि जमातीचे कोणते आहेत प्रभाग, जाणून घ्या

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या सन २०२५च्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण सोडत मंगळवारी ११

आठव्या मजल्यावरून पडून मजुराचा जागीच मृत्यू

मालाड : मालाड पूर्व येथील शांती नगर भागात सुरू असलेल्या एका नवीन इमारतीच्या बांधकाम साईटवर आठव्या मजल्यावरून

अपघात रोखण्यासाठी समन्वयाने कृती गरजेची !

रस्ता सुरक्षा समितीची राज्य सरकारला सूचना मुंबई  : सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश तथा रस्ता

अॅड. पल्लवी पूरकायस्थ हत्या प्रकरण; आरोपीची जन्मठेप हायकोर्टातही कायम

मुंबई : वकील पल्लवी पूरकायस्थ (२५) हिच्या २०१२ मध्ये झालेल्या हत्या प्रकरणातील दोषसिद्ध आरोपी सज्जाद मुघल याला