स्वातंत्र्यदिनी मांसाहार विक्री बंदीवरून आदित्य आणि जितेंद्र आव्हाडांची पुराव्यासकट भाजपने केली बोलती बंद!

तेव्हा जिभेवर कुलूप, तोंड उघडण्यापूर्वी निर्णय वाचून घ्या; भाजप नेते नवनाथ बन यांचे आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर


मुंबई: स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी चिकन-मटण विक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या काही महानगरपालिकांच्या आदेशावरून राज्यात राजकारण तापले आहे. या निर्णयावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. आता या टीकेला भाजप नेते नवनाथ बन यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. बन यांनी म्हटले आहे की, हा निर्णय आजचा नाही, तर १२ मे १९८८ रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारनेच घेतला होता आणि तेव्हापासून तो लागू आहे. त्यामुळे या निर्णयावर टीका करण्यापूर्वी आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी इतिहास तपासावा.



'मांसाहार बंदी'चा जुना निर्णय आणि भाजपची भूमिका


नवनाथ बन यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट करून म्हटले की, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती, रामनवमी आणि महावीर जयंती अशा राष्ट्रीय आणि धार्मिक महत्त्वाच्या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्याचा अधिकार महापालिकांना आहे. हा निर्णय स्थानिक लोकप्रतिनिधींच्या ठरावानुसार घेतला जातो. विशेष म्हणजे, महाविकास आघाडी सरकारच्या काळातही हाच निर्णय कायम ठेवण्यात आला होता, पण तेव्हा या नेत्यांच्या तोंडावर कुलूप होते, अशी खोचक टीका बन यांनी केली आहे. आता मात्र राजकारणासाठी ते 'अत्याचार' सुरू असल्याचा कांगावा करत आहेत. 'तोंड उघडण्यापूर्वी किमान जुना निर्णय वाचून घ्या,' असा सल्लाही त्यांनी दिला.





उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका


या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपली भूमिका मांडली. 'कोणी काय खावे किंवा खाऊ नये, यावर बंदी घालणे योग्य नाही,' असे ते म्हणाले. काही धार्मिक प्रसंगी, जसे की आषाढी एकादशी किंवा महावीर जयंती, अशी बंदी घातली जाते तेव्हा लोक समजू शकतात. पण १५ ऑगस्टला अशी बंदी घालणे महाराष्ट्रात योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. या प्रकरणात सविस्तर माहिती घेणार असल्याचेही त्यांनी माध्यमांना सांगितले.



विविध शहरांमध्ये बंदीचे आदेश


मालेगाव महानगरपालिकेने १५, २० आणि २७ ऑगस्ट रोजी सर्व खासगी कत्तलखाने आणि मांसाहार विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये श्रीकृष्ण जयंती (२० ऑगस्ट) आणि जैन पर्युषण पर्व तसेच गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट) या दिवसांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे राज्यातील बहुतेक सर्व महापालिकांनीही १५ ऑगस्ट रोजी सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Comments
Add Comment

राज्यभरात आज दसरा मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे, नेस्कोमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे, तर बीडमध्ये पंकजा मुंडेंचा मेळावा

मुंबई : राज्यभरात आज विविध राजकीय नेत्यांचे दसरा मेळावे होत आहेत.  यंदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि

८ ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून निरोप घेणार

मुंबई (प्रतिनिधी) : २९ सप्टेंबरपासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे. मात्र २ ते ७ ऑक्टोबर दरम्यान

सेंट झेवियरमधील भूमिगत पाण्याच्या साठवण टाकीचे नियोजन फसले

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील सर्वात मोठे पुरप्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जात असलेल्या हिंदमाता सिनेमा

अतिवृष्टी, पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ११ वी ऑनलाईन प्रवेशासाठी आणखी एक संधी

मुंबई : राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश

कोस्टल रोड- मार्वे रोड जोडणाऱ्या मार्गावरील पुलांच्या बांधकामाला आता गती, मागवल्या तब्बल २२०० कोटी रुपयांच्या निविदा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड मार्वे रोडशी जोडणारे नवीन मार्ग आणि

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द

मुंबई : राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के दरवाढ रद्द