मुंबईत दहीहंडीच्या सरावावेळी ११ वर्षांच्या गोविंदाचा मृत्यू

मुंबई : दहीहंडी या सणाला आता एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. गोविंदा पथकांचा दहीहंडी फोडण्याचा सराव जोरात सुरू आहे. अशा वेळी मुंबईतून एक दुःखद बातमी आली आहे. मुंबईतील दहिसरमध्ये केतकीपाडा परिसरात दहीहंडीच्या सरावावेळी ११ वर्षांच्या गोविंदाचा मृत्यू झाला. महेश रमेश जाधव याचा सरावावेळी उंचावरुन पडल्यामुळे मृत्यू झाला.

सराव सुरू होता, महेश वरच्या थरावर पोहोचण्यासाठी वेगाने हालचाली करत होता. पण चढत असताना त्याचा तोल आणि घात झाला. तो जमिनीवर कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी जास्त वेळच मिळाला नाही.

दहिसर पोलिसांनी महेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटना नेमकी कशी घडली, याचा तपास सुरू आहे.

यंदा १६ ऑगस्ट रोजी दहीहंडी आहे. मुंबईतील दहीहंडी उत्सव जगभर प्रसिद्ध आहे. हजारो गोविंद पथके या उत्सवात सहभागी होतात. जिद्दीने आणि उत्साहाने गोविदा पथके सण साजरा करतात. मानवी मनोऱ्यांचा थरार साऱ्यांना अनुभवायला मिळतो. दिवसभर विविध ठिकाणी मानाच्या हंड्या फोडून मोठमोठी बक्षीसे गोविंदा पथक पटकावतात. दहीहंडी फोडताना अनेक मंडळांकडून सात ते नऊ थर रचले जातात. हे थर रचताना अनेक गोविंदा जखमीही होतात. यामुळे सुरक्षेची काळजी घेणे महत्वाचे असते. ताज्या घटनेमुळे गोविंदांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
Comments
Add Comment

अरुण गवळी तुरुंगातून बाहेर, आता लेक योगिता गवळी राजकारणात सक्रिय!

मुंबई: अनेक वर्षांनी तुरुंगातून बाहेर आलेले माजी आमदार अरुण गवळी यांनी आता राजकारणात सक्रिय होणार नसल्याचे

मत्स्यव्यवसाय विकासासाठी बजेट वाढवा; मंत्री नितेश राणे यांच्याकडे मत्स्यशेतकऱ्यांची मागणी

मुंबई : राज्यातील मत्स्यशेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचे सक्षमीकरण यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश

परिवहन सेवेचे पुढचे पाऊल ‘पॉड टॅक्सी’

‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी पॉड टॅक्सी सेवा नागरिकांच्या सेवेत आणावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :

Rain Update : राज्यात २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान पावसात वाढ होण्याची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत मुंबई : २४ सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा

२६ ते २८ सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसात वाढ होण्याची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत मुंबई : २४ सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

मुंबई: शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, मुंबईत मोठ्या संख्येने भाविकांनी शहरातील प्रमुख मंदिरांना भेट दिली,