मुंबईत दहीहंडीच्या सरावावेळी ११ वर्षांच्या गोविंदाचा मृत्यू

मुंबई : दहीहंडी या सणाला आता एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. गोविंदा पथकांचा दहीहंडी फोडण्याचा सराव जोरात सुरू आहे. अशा वेळी मुंबईतून एक दुःखद बातमी आली आहे. मुंबईतील दहिसरमध्ये केतकीपाडा परिसरात दहीहंडीच्या सरावावेळी ११ वर्षांच्या गोविंदाचा मृत्यू झाला. महेश रमेश जाधव याचा सरावावेळी उंचावरुन पडल्यामुळे मृत्यू झाला.

सराव सुरू होता, महेश वरच्या थरावर पोहोचण्यासाठी वेगाने हालचाली करत होता. पण चढत असताना त्याचा तोल आणि घात झाला. तो जमिनीवर कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी जास्त वेळच मिळाला नाही.

दहिसर पोलिसांनी महेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटना नेमकी कशी घडली, याचा तपास सुरू आहे.

यंदा १६ ऑगस्ट रोजी दहीहंडी आहे. मुंबईतील दहीहंडी उत्सव जगभर प्रसिद्ध आहे. हजारो गोविंद पथके या उत्सवात सहभागी होतात. जिद्दीने आणि उत्साहाने गोविदा पथके सण साजरा करतात. मानवी मनोऱ्यांचा थरार साऱ्यांना अनुभवायला मिळतो. दिवसभर विविध ठिकाणी मानाच्या हंड्या फोडून मोठमोठी बक्षीसे गोविंदा पथक पटकावतात. दहीहंडी फोडताना अनेक मंडळांकडून सात ते नऊ थर रचले जातात. हे थर रचताना अनेक गोविंदा जखमीही होतात. यामुळे सुरक्षेची काळजी घेणे महत्वाचे असते. ताज्या घटनेमुळे गोविंदांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या

मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण

पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले

Amitabha bachchan Dharmendra : 'अन् निःशब्द शांतता...' धर्मेंद्र यांच्या अंतिम निरोपानंतर 'जय'ची हृदयस्पर्शी पोस्ट व्हायरल

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला आहे.

उत्तन - विरार सी लिंकचा विस्तार वाढवण बंदरापर्यंत

- एमएमआरमधील प्रवासाला येणार वेग मुंबई : महाराष्ट्र शासनाने उत्तन–विरार सी लिंक आणि तिचा वाढवण बंदरापर्यंत

कस्तुरबा रुग्णालयात उभारणार १३० केव्हीचा सौर ऊर्जा प्रकल्प

दरवर्षी ११ लाख रुपयांची होणार बचत मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने ऊर्जा बचतीच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकून