लातूर : “मुंडेसाहेबांनी त्यांच्या जिवंतपणीच मला वारस घोषित केलं. त्यामुळे त्या वारशासोबत संघर्ष आणि कारस्थानही माझ्या वाट्याला आलं,” असा थेट आणि स्पष्ट खुलासा राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केला. लातूर येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना त्या भावुक झाल्या आणि त्यांनी राजकीय आयुष्यातील अनुभवही मोकळेपणाने मांडले.
“माझ्या वडिलांनी त्यांच्या तोंडून स्पष्ट सांगितलं होतं की मीच त्यांच्या वारशाची खरी हक्कदार आहे. त्यामुळे या वारशाला सुईच्या टोकाइतकाही धक्का लागू देणार नाही,” असा ठाम निर्धार राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. लातूरमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना त्या म्हणाल्या, “मुंडे साहेबांच्या वारशासोबत संघर्षही आला, अडचणीही आल्या. पण आम्ही वडिलांनी दिलेल्या संस्कारांत राहिलो. कुणाबद्दलही वाईट विचार केला नाही.” त्या पुढे म्हणाल्या की, “संघर्ष आणि कारस्थानांच्या काळातही आम्ही सकारात्मकतेने आणि प्रामाणिकपणे वाटचाल केली. वडिलांनी शिकवलेलं बेरजेचं राजकारण हेच आमचं ब्रीद आहे.”
मुंडेसाहेबांनी सांगितलं, पंकजा तू माझी वारस
“मुंडेसाहेबांनी त्यांच्या जिवंतपणी मला वारस घोषित केलं होतं. हा वारसा केवळ संपत्ती, जमीन किंवा पैशाचा नव्हता, तर तो विचारांचा, संस्कारांचा आणि संघर्षातून उभं राहण्याच्या ताकदीचा वारसा होता,” अशी भावना राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. लातूरमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. वडिलांविषयी बोलताना त्या भावूक होत म्हणाल्या, “माझे वडील माझे गुरू होते. त्यांनी मला काय करायचं हे कधी शिकवलं नाही, पण काय करायचं नाही हे मात्र नेहमी शिकवलं. हीच त्यांची खरी शिकवण होती.” त्या पुढे म्हणाल्या, “आज माझ्या वडिलांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहतोय. या क्षणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, मी मंत्री आहे हेच आपल्या नात्याचं आणि राजकीय मैत्रीचं खरं प्रेम आहे.”
नेहमीच गणित हे ‘बेरजेचं’ असावं
राजकारणात तुकडे उचलत बसायचं नसतं, स्वाभिमान जपायचा असतो आणि कोणत्याही परिस्थितीत झुकायचं नसतं — अशी शिकवण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी दिली होती, असं राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. लातूरमध्ये आयोजित स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या, “मुंडे साहेबांनी आम्हाला नेहमी शिकवलं की, राजकारण करताना कुणाबद्दलही द्वेष बाळगायचा नाही. नेहमीच गणित हे ‘बेरजेचं’ असावं, वजाबाकीचं नव्हे. त्यांच्या या शिकवणीवर मी काम करते आहे. हीच पद्धत देवेंद्र फडणवीसांनीही अवलंबली आणि आज आपण सत्तेत आहोत.”
नवी मुंबई : नेरुळमधील प्रमुख हृदयविकार उपचार केंद्र असलेल्या सुश्रूषा हॉस्पिटलमध्ये सोमवारी सकाळी शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. ही घटना सकाळी ...
मुंडे साहेबांची सुधारित आवृत्ती
"माझी कार्यपद्धती ही मुंडे साहेबांसारखी नाही, असं अनेकजण म्हणतात. होय, ती तंतोतंत तशी नाही, पण ती त्यांना अपेक्षित असलेलीच आहे," असे स्पष्ट वक्तव्य राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. त्या म्हणाल्या, "मुंडे साहेबांनी मला सांगितलं होतं, तुला गोपीनाथ मुंडे व्हायचं आहे, पण सुधारित आवृत्ती व्हायचं आहे. हेच वाक्य माझ्या राजकीय कामकाजाचा पाया आहे. त्यामुळे कधीही स्वाभिमान गहाळ न करता राजकारण करण्याचं वचन मी वडिलांना दिलं असून, त्या वचनाशी मी कधीही प्रतारणा करणार नाही."
'त्याक्षणी देवेंद्र फडणवीस माझ्या समोर उभे होते'
गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीत पंकजा मुंडे भावुक झाल्या. स्वर्गीय मुंडे यांच्या निधनाच्या प्रसंगाची आठवण काढताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. त्या म्हणाल्या, "मुंडे साहेबांचा अपघात झाला, तेव्हा मी घाईघाईने दिल्लीला पोहोचले. तिथे गेल्यावर माझ्या आजूबाजूला कुणी ओळखीचे नव्हते. त्या क्षणी फक्त देवेंद्र फडणवीस माझ्या समोर उभे होते. ते एकमेव परिचित असल्याने मी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून ठसठसून रडले." पंकजा पुढे म्हणाल्या, "दिल्लीला जाताना मनात एकच आशा होती काहीतरी चमत्कार होईल आणि मुंडे साहेब उठून बसतील. पण नियतीसमोर आपण हतबल होतो. ती आशा धुळीस मिळाली आणि माझं आयुष्य कायमच बदललं."