बांबूच्या चटईतून बाप्पाची शाश्वत आरास

देसले कुटुंबाचा संस्कृतीस्नेही उपक्रम


ठाणे : गणेशोत्सव हा फक्त भक्तिभावाचा नव्हे तर संस्कृती, परंपरा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा उत्सव आहे. मात्र प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकोल, रासायनिक रंगांच्या अतिरेकी वापरामुळे उत्सवावर प्रदूषणाचे सावट पसरू लागले आहे.


या पार्श्वभूमीवर, ठाण्यातील राममारुती रोडवरील कैलास देसले कुटुंबाने बाप्पाच्या स्वागतासाठी पर्यावरणपूरक आरास करण्याचा ध्यास घेतला आहे. शिवसमर्थ विद्यालयाजवळील त्यांच्या कार्यशाळेत गेली अनेक वर्षे गणपती मखर तयार होत आहेत.


या कामात कैलास देसले यांच्यासोबत पत्नी मनिषा तसेच मुले भाग्य आणि यश यांचाही उत्साही सहभाग असतो. कटिंगपासून फिटींगपर्यंत, नक्षीकामापासून रंगसजावटीपर्यंत-संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन मखराची कलात्मक निर्मिती करते. चित्रकार असलेला भाग्य विविध पॅटर्न्स साकारतो, तर बासरीवादक यश मंडपाची कलात्मक सजावट करतो.


कैलास देसले यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. त्या अनुभवाचा वापर ते गणपतीचे मखर साकारण्यासाठी करतात.



सजावटीचा केंद्रबिंदू


यंदाच्या सजावटीचा केंद्रबिंदू आहे. बांबूची चटई. बांबू ही नैसर्गिक, टिकाऊ आणि बांबू वेगाने वाढणारी वनस्पती असल्याने ती पर्यावरणपूरक सजावटीसाठी आदर्श मानली जाते. बांबूच्या चटईला रंग देऊन, नक्षीकाम करून, पाने-फुले-मातीचे दिवे जोडून मंदिराचा आकार देण्यात आला आहे.


पौराणिक छत्र, झुंबर, कोकणातील मंदिराची झलक, कापडी झालरी आणि लाकडी पट्ट्यांनी सजलेले सिंहासन - या सर्वांनी आरास अधिकच देखणी झाली आहे. ‘सण साजरा करताना निसर्गाचं भान ठेवणं हीच खरी संस्कृती आहे.


ही आरास केवळ सजावट नाही, तर पुढच्या पिढीसाठी एक संदेश आहे,’ असे कैलास देसले सांगतात. बाजारात चकाकणाऱ्या थर्माेकॉल आणि रासायनिक रंगांच्या आराशीत, ‘देसले’ कुटुंबाचा हा बांबूच्या चटईतून साकारलेला बाप्पाचा दरबार पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे खरे उदाहरण ठरत आहे.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये