स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारोह मुंबईत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण, तर दोन्ही उपमुख्यमंत्री...

  143

राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर


मुंबई: भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे सकाळी ०९.०५ वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. तर राज्यामधील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पुढील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, असे सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

अजित पवार बीड तर एकनाथ शिंदे ठाण्यात 


यंदा अजित पवार बीडला जाणार आहेत. त्यामुळे, पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे. पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार ध्वजारोहण सोहळ्यासाठी बीडला जाणार आहेत. तर रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आदिती तटकरे यांच्याहस्ते ध्वजारोहण होणार आहे. तर, नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यातील ध्वजारोहण सोहळ्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा आणि ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

ठाणे- एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे

बीड- अजित आशाताई अनंतराव पवार

नागपूर- चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे

अहिल्यानगर- राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे - पाटील

गोंदिया- छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ

सांगली- चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील

नाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजन

पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक

जळगाव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील

अमरावती- दादाजी रेश्माबाई दगडू भुसे

यवतमाळ- संजय प्रमिला दुलिचंद राठोड

रत्नागिरी- उदय स्वरुपा रवींद्र सामंत

धुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल

जालना- श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे

नांदेड- अतुल लिलावती मोरेश्वर सावे

चंद्रपूर- डॉ.अशोक जनाबाई रामाजी वुईके

सातारा- शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाई

मुंबई उपनगर- ॲड.आशिष मिनल बाबाजी शेलार

वाशिम- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे

रायगड- कु.आदिती वरदा सुनिल तटकरे

लातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले

नंदुरबार- ॲड.माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे

सोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरे

हिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ

भंडारा- संजय सुशिला वामन सावकारे

छत्रपती संभाजीनगर- संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट

धाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक

बुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)

सिंधुदुर्ग- नितेश निलम नारायण राणे

रायगड- अदिती सुनील तटकरे

अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर

कोल्हापूर- प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर

गडचिरोली- ॲड.आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल

वर्धा- डॉ. पंकज कांचन राजेश भोयर आणि

परभणी- श्रीमती मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर

राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमासाठी पालकमंत्री निश्चित झाले नसल्यास किंवा निश्चित झालेले पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी हे ध्वजारोहण करतील. विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन येथील ध्वजारोहण विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या हस्ते करण्यात यावे, असेही राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
Comments
Add Comment

खातेअंतर्गत PSI परीक्षेचा मार्ग मोकळा, मिळणार २५ टक्के आरक्षण

राज्य सरकारने पीएसआय पदासाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू केली मुंबई: राज्य सरकारने पीएसआय पदासाठी २५ टक्के

अटल सेतुसह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी: प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई: राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याचे धोरण

Beed Crime : "परळी हादरली! आईला झोप लागली अन् चार वर्षांच्या चिमुकलीवर परळी रेल्वे स्थानकात अत्याचार, आरोपीला फाशीचीच मागणी

परळी : परळी रेल्वे स्थानक परिसरात अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना समोर

Nitesh Rane on Jarange Patil: जरांगेंचे आंदोलन संपल्यानंतर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया, "ज्या फडणवीसांवर टीका करत होते, त्यांनीच..."

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले ५ दिवस नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण

Manoj Jarange health Update: मुंबईतील उपोषणानंतर जरांगे संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली ही माहिती

संभाजीनगर: आझाद मैदानावरील पाच दिवसांच्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता करत, अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या

मोठी बातमी! सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात तब्बल १७० पोलिसांना अन्नातून विषबाधा

सोलापूर: सोलापूरमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याने मोठी खळबळ उडाली.