श्रावण संपताच माशांच्या खरेदीवरून हायवेवर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

गोरखपूर: श्रावण महिना संपताच मासे खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या खवय्यांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे. माशांच्या दुकानावर खरेदी करण्याच्या वादातून दोन गट थेट राष्ट्रीय महामार्गावर भिडले. या भांडणाने विकोपाचे रूप धारण केले आणि दोन्ही गटांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.



नेमके काय घडले?


ही घटना शनिवारी संध्याकाळी गोरखपूर जिल्ह्यातील पिपराईच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीपीगंज बाजारामध्ये घडली. नेपाळकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एका माशांच्या दुकानावर ही घटना घडली. कोलहुवा गावातील मुकेश कुमार चौहान आणि भगवानपूर गावातील रितिक चौहान हे दोघेही प्रत्येकी पाच किलो रोहू माशांची ऑर्डर देण्यासाठी दुकानात आले होते. मात्र, त्या वेळी दुकानात फक्त चार किलो मासे शिल्लक होते. याच चार किलो माशांवरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.


दुकानदाराने दोघांनाही मासे अर्धे-अर्धे वाटून घेण्याचा किंवा दुसऱ्या दुकानातून खरेदी करण्याचा सल्ला दिला, पण दोन्ही बाजूंनी ते ऐकले नाही. बघता-बघता त्यांच्यातील शाब्दिक बाचाबाचीने धक्काबुक्कीचे आणि नंतर हाणामारीचे स्वरूप घेतले.



हायवेवर वाहतूक कोंडी


हे दोन गट एकमेकांना मारहाण करत असताना, ते रस्त्याच्या मधोमध आले. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक थांबली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.



पोलिसांची कारवाई


घटनेची माहिती मिळताच पिपराईच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने दोन्ही गटांना शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे हायवेवर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला