एअर इंडिया एक्सप्रेसची ‘फ्रीडम सेल’ घोषणा

मुंबई : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एअर इंडिया एक्सप्रेसने “फ्रीडम सेल”ची घोषणा करत प्रवाशांना सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेअंतर्गत तब्बल ५० लाख सवलतीच्या आसनांची विक्री १० ते १५ ऑगस्ट दरम्यान करण्यात येणार आहे.


भाड्यांची सुरुवात फक्त १,२७९ रु पासून देशांतर्गत प्रवासासाठी तिकिटांचे दर केवळ १,२७९ रु पासून सुरू होत असून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी किमान भाडे ४,२७९ रु इतके आहे. हे दर १९ ऑगस्ट २०२५ ते ३१ मार्च २०२६ या प्रवास कालावधीस लागू आहेत. यामध्ये ओणम, दुर्गापूजा, दिवाळी आणि नाताळसारखे मोठे सण समाविष्ट आहेत. तिकिटे विमान कंपनीच्या संकेतस्थळावर, मोबाईल अ‍ॅपवर आणि सर्व प्रमुख बुकिंग चॅनेल्सवर उपलब्ध आहेत.





प्रवाशांसाठी विविध भाडेवर्ग


एक्सप्रेस लाइट– चेक-इन सामानाशिवाय किफायतशीर पर्याय. फक्त अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध. देशांतर्गत १,२७९ रु आणि आंतरराष्ट्रीय ४,२७९ रु पासून.


एक्सप्रेस व्हॅल्यू – चेक-इन सामानासह भाडे; देशांतर्गत १,३७९ रु आणि आंतरराष्ट्रीय ४,४७९ रु पासून.


एक्सप्रेस बिझ – ५८ इंचापर्यंत सीट पिच असलेली प्रीमियम केबिन सेवा. अलीकडे ताफ्यात समाविष्ट ४० हून अधिक नव्या विमानांवर उपलब्ध.


लॉयल्टी मेंबर्स व विशेष गटांसाठी लाभ


लॉयल्टी प्रोग्राम सदस्यांना एक्सप्रेस बिझ भाड्यावर २५% सवलत तसेच अतिरिक्त सामान, ‘गुर्मेअर’ गरम जेवण, सीट निवड, प्राधान्य सेवा व अपग्रेडवर २० टक्के सवलत मिळेल. विद्यार्थ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, संरक्षण दलातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष भाडेदर सुरूच राहतील.



वाढता ताफा व जाळे


११६ विमानांचा ताफा असलेली कंपनी दररोज ५०० हून अधिक उड्डाणे करते. ती ३८ देशांतर्गत आणि १७ आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थळांना जोडते. “टेल्स ऑफ इंडिया” उपक्रमाअंतर्गत विमानांच्या शेपटावर बंधणी, अजरख, पटोला, वारली, ऐपण आणि कलमकारीसारख्या पारंपरिक कापड डिझाईन्सचा समावेश करून भारताच्या सांस्कृतिक वारशाला सलाम केला जातो.


भारत–मध्यपूर्व मार्गांवर विशेष उपस्थिती राखत, प्रवाशांना प्रशस्त आसन, चविष्ट गरम जेवण आणि विविध गरजांना पूरक भाडेवर्ग उपलब्ध करून देत एअर इंडिया एक्सप्रेसने स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रवास अधिक परवडणारा आणि आनंददायी केला आहे.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या