वाईत रक्षाबंधनाला महिलांची भावनिक साद, मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिलं पत्र, लाडक्या बहिणींनी केली न्यायाची मागणी

"ओवाळणीत दीड हजार नको, तुमच्या लाडक्या बहिणींना अवैध क्रेशर बंद करून न्याय द्या,”


वाई: साताऱ्यातील वाईमधील लाडक्या बहिणींनी रक्षा बंधनाच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिल्याची बातमी समोर आली आहे. या पत्रात देवेंद्र फडणवीस यांना लाडक्या बहीण योजनांचे हफ्ते नव्हे तर न्याय हवा असल्याचे म्हंटले आहे. नेमके प्रकरण काय आहे, सविस्तर माहिती घेऊ.


वाई तालुक्यातील बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेला दगडी खान क्रेशर बंद करण्यात यावा या मागणीसाठी मागील अनेक दिवसापासून वाई ते मुंबई मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर असलेल्या रक्षाबंधनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून बेकायदेशीर क्रेशर बंद करण्यात यावा अशा मागणीसाठी महिलांनी आपल्या रक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना पत्र लिहिले आहे.


पत्रात काय लिहिले?


रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींच्या खात्या १२ वा हफ्ता आता जमा होऊ लागला आहे, मात्र या दरम्यानच वाई तालुक्यातील बेकायदेशीरपद्धतीने सुरु असलेला दगडी खान क्रेशर विरोधात सुरु असलेल्या लॉन्ग मार्च समर्थनार्थ, काही महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या रक्ताने पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हंटले कि, “देवा भाऊ, ओवाळणीत दीड हजार नको, तुमच्या लाडक्या बहिणींना अवैध क्रेशर बंद करून न्याय द्या,”

Comments
Add Comment

शाळेची बस दरीत कोसळली, एकाचा मृत्यू आणि अनेक जखमी

नंदुरबार : शाळेच्या मुलांना घेऊन चाललेली बस अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई घाट परिसरात शे-दिडशे फूट खोल दरीत

एसटीच्या धडकेने ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी

पुणे : स्वारगेट बस डेपोमध्ये (स्वारगेट बस स्थानक) एक विचित्र अपघात झाला. चालक एसटी मागे घेत होता. ही रिव्हर्सची

एसटीने गणपतीला कमावले आणि दिवाळीत गमावले! कारण काय?

एसटीला ऑक्टोबरमध्ये १८० कोटींचा फटका तिकीट महसुलात सरासरी ६ कोटींची दैनंदिन तूट मुंबई : दिवाळीसारख्या

प्रचार करणार कधी? इच्छूक उमेदवार संभ्रमात!

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच,

Bhandara Accident News : भंडारा हादरले! - २२ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा भीषण अपघात; २२ विद्यार्थी जखमी

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. २२ शालेय विद्यार्थ्यांना (School Bus Accident) घेऊन

'वंदे भारत'ची दिवाळीत बक्कळ कमाई

पुणे (प्रतिनिधी) : जलद सेवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या 'वंदे भारत'ला दिवाळीमध्ये प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.