वाईत रक्षाबंधनाला महिलांची भावनिक साद, मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिलं पत्र, लाडक्या बहिणींनी केली न्यायाची मागणी

"ओवाळणीत दीड हजार नको, तुमच्या लाडक्या बहिणींना अवैध क्रेशर बंद करून न्याय द्या,”


वाई: साताऱ्यातील वाईमधील लाडक्या बहिणींनी रक्षा बंधनाच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिल्याची बातमी समोर आली आहे. या पत्रात देवेंद्र फडणवीस यांना लाडक्या बहीण योजनांचे हफ्ते नव्हे तर न्याय हवा असल्याचे म्हंटले आहे. नेमके प्रकरण काय आहे, सविस्तर माहिती घेऊ.


वाई तालुक्यातील बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेला दगडी खान क्रेशर बंद करण्यात यावा या मागणीसाठी मागील अनेक दिवसापासून वाई ते मुंबई मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर असलेल्या रक्षाबंधनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून बेकायदेशीर क्रेशर बंद करण्यात यावा अशा मागणीसाठी महिलांनी आपल्या रक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना पत्र लिहिले आहे.


पत्रात काय लिहिले?


रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींच्या खात्या १२ वा हफ्ता आता जमा होऊ लागला आहे, मात्र या दरम्यानच वाई तालुक्यातील बेकायदेशीरपद्धतीने सुरु असलेला दगडी खान क्रेशर विरोधात सुरु असलेल्या लॉन्ग मार्च समर्थनार्थ, काही महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या रक्ताने पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हंटले कि, “देवा भाऊ, ओवाळणीत दीड हजार नको, तुमच्या लाडक्या बहिणींना अवैध क्रेशर बंद करून न्याय द्या,”

Comments
Add Comment

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर