महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा तत्काळ लागू करावा

मानसिक छळ, मारहाण, लैंगिक अत्याचार, आत्महत्येसारखे गंभीर प्रकार


पुणे: महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा तत्काळ लागू करावा, अशी मागणी करत सकल हिंदू समाजाच्या महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधून ही ओवाळणी देण्याची मागणी शुक्रवारी केली.


नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून सकल हिंदू समाजाच्या वतीने राज्यभर जनजागृती मोहिमेची सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत हिंदू महिलांनी आपल्या भागातील आमदार, खासदार, नगरसेवक व स्थानिक लोकप्रतिनिधींना राखी बांधून महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा तत्काळ लागू करण्याची मागणी केली. पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस कवायत मैदान येथे सकाळी या उपक्रमाचा सोहळा पार पडला. मुख्यमंत्री फडणवीस यांना अनेक हिंदू महिलांनी राखी बांधली व लव्ह जिहादविरोधी कायद्याची जलद अंमलबजावणी करण्याची गरज पटवून दिली.


कायदा संमत करून अमलात आणावा
‘महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रेमाच्या नावाखाली अनेक हिंदू युवतींना फसवून नंतर जबरदस्तीने धर्मांतरास भाग पाडले जाते. या घटनांमध्ये मानसिक छळ, मारहाण, लैंगिक अत्याचार, आत्महत्येसारखे गंभीर प्रकार घडत असून त्याला आळा घालण्यासाठी स्वतंत्र व कठोर कायदा आवश्यक आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गुजरात या राज्यांमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदे अस्तित्वात आहेत. महाराष्ट्रात असा कायदा नाही. परिणामी पोलिसांनाही कारवाई करताना कायदेशीर मर्यादा भेडसावत आहेत. म्हणून राज्य सरकारने कठोर कायदा संमत करून अमलात आणावा,’ अशी मागणी फडणवीस यांच्याकडे केली आहे.


Comments
Add Comment

Dharashiv : महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात एकच गोंधळ, महिलेनं अंगावर पेट्रोल ओतलं अन्…

Dharashiv : धाराशिव येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीसमोर आयोजित करण्यात आलेल्या मुख्य झेंडावंदन कार्यक्रमादरम्यान एका 40

Suresh Kumar Jaithalia : माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे निधन

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी आमदार

Devendra Fadnavis : "महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे पण ..."; महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडले स्पष्ट मत

मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र

HSC Results 2026 : बारावीचा निकाल काही तासांवर; जाणून घ्या निकाल कुठे आणि कसा पाहता येणार?

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा २०२६ चा निकाल उद्या म्हणजेच शनिवार २ मे रोजी जाहीर होणार

Weather Update : पुढील ४८ तास अतिशय महत्त्वाचे! उष्णतेतून दिलासा, पण अवकाळीचं नवं संकट दारात; IMDचा हाय अलर्ट

मुंबई : राज्यात सध्या उष्णतेचा कडाका शिगेला पोहोचला असून विशेषतः विदर्भात परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक

Nashik : नाशिक जिल्ह्यातील 45 हजार नावं शिधापत्रिकेच्या यादीतून हटवली, तुमचंही नाव यादीत तर नाही ना ?

नाशिक : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील, 45 हजार 948 आयकरदात्यांची नावं शिधापत्रिकेच्या यादीतून