गणेशोत्सवासाठी मुंबई महानगर क्षेत्रातून सुटणाऱ्या जादा एसटी बससाठीही वेगानं होतंय आरक्षण

मुंबई : यंदा २७ ऑगस्ट पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई महानगर क्षेत्रातून कोकणात जाणाऱ्या संख्या मोठी आहे. गणेशभक्तांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने मुंबई महानगर क्षेत्रातून नियमित गाड्यांव्यतिरिक्त मोठ्या संख्येने जादा गाड्यांचीही व्यवस्था केली आहे. यापैकी ५० टक्के गाड्यांचे आरक्षण आतापर्यंत झाले आहे. गणेशोत्सवापर्यंत सर्व गाड्यांचे आरक्षण पूर्ण होईल, असा विश्वास एसटी महामंडळाने व्यक्त केला आहे.

नियमित एसटी स्थानकांतील गर्दी टाळण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळासाठी एसटी महामंडळाने मुंबई महानगर क्षेत्रात तात्पुरते ४० बस थांबे निश्चित केले आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार बसथांब्यावरून कोकणात जादा गाड्या पाठवण्याचे नियोजन आहे. मुंबई महानगर क्षेत्रातून कोकणासाठी २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान पाच हजार जादा गाड्या सोडण्याची घोषणा महामंडळाने केली आहे. महिला, ज्येष्ठ नागरिकांना विशेष गाड्यांमध्ये सवलत आहे. पण नियमित गाड्यांच्या आरक्षणावर १५ टक्के सवलत जादा गाड्यांसाठी लागू करण्यात आलेली नाही. जादा गाड्यांपैकी १,५४७ गाड्यांचे सामूहिक आणि ५३३ गाड्यांचे वैयक्तिक आरक्षण पूर्ण झाले आहे. सध्या १०६ गाड्यांचे आरक्षण सुरू आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने जादा गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध आहेत.

गणेशोत्सवासाठी मुंबई महानगर क्षेत्रातील कोणकोणत्या थांब्यांवरुन सुटणार बस ?

मुंबई सेंट्रल - साईबाबा, काळाचौकी, गिरगाव, कफ परेड, काळबादेवी, महालक्ष्मी
परळ - सेनापती बापट मार्ग दादर, मांगल्य हॉल (जोगेश्वरी)
कुर्ला नेहरूनगर - बर्वेनगर, सर्वोदय, टागोरनगर, घाटला, डी.एन. नगर, गुंदवली, आनंदनगर, शास्त्रीनगर, पार्ले, खेरनगर, वांद्रे, शीव
ठाणे - लोकमान्यनगर, श्रीनगर, विटावा, भाईंदर, नॅन्सी कॉलनी, मालाड, डहाणूकरवाडी / चारकोप, महंतचौक, संकल्प सिद्धी गणेश, भांडुप (पश्चिम आणि पूर्व), मुलुंड
विठ्ठलवाडी - बदलापूर, अंबरनाथ
कल्याण - डोंबिवली
नालासोपारा - नालासोपारा आगार
पनवेल - पनवेल आगार
उरण - उरण आगार
वसई - वसई आगार
अर्नाळा - अर्नाळा आगार
Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा