Nagpur Temple Collapsed: महालक्ष्मी मंदिरातील निर्माणाधीन छत कोसळले, १७ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

कोराडीच्या महालक्ष्मी मंदिर परिसरातील घटना


नागपूर:  नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या महालक्ष्मी मंदिर परिसरात निर्माणाधीन बांधकाम कोसळून १७ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज, शनिवारी घडली. घटनेची माहिती मिळताच प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सदर ठिकाणी धाव घेतली.

यासंदर्भातील प्रारंभिक माहितीनुसार कोराडी इथल्या महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात निर्माण कार्य सुरू आहे. खापरखेडा ते कोराडी मंदिर मार्गावर तिर्थ क्षेत्र विकास निधीतून भव्य स्वागत द्वार उभारण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी शनिवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमाराला ३५ फूट उंचीचे छत कोसळल्याची घटना घडली.

 

प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात सुमारे १७ जण जखमी झाले असून त्यापैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर सदर बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या लोकांनी घटनास्थळाहून काढता पाय घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. घटनास्थळी स्थानिक प्रशासन, पोलिस आणि एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झाली आहे.

यासंदर्भात नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर म्हणाले की, या अपघातात एकूण १७ जण जखमी झाले आहेत. जखमींना ३ खासगी रुग्णालयात हलवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान सदर बांधकामाचे कंत्राट कुठल्या कंपनीचे आहे याबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात असून त्यासंदर्भात कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,