Nagpur Temple Collapsed: महालक्ष्मी मंदिरातील निर्माणाधीन छत कोसळले, १७ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

कोराडीच्या महालक्ष्मी मंदिर परिसरातील घटना


नागपूर:  नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या महालक्ष्मी मंदिर परिसरात निर्माणाधीन बांधकाम कोसळून १७ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज, शनिवारी घडली. घटनेची माहिती मिळताच प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सदर ठिकाणी धाव घेतली.

यासंदर्भातील प्रारंभिक माहितीनुसार कोराडी इथल्या महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात निर्माण कार्य सुरू आहे. खापरखेडा ते कोराडी मंदिर मार्गावर तिर्थ क्षेत्र विकास निधीतून भव्य स्वागत द्वार उभारण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी शनिवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमाराला ३५ फूट उंचीचे छत कोसळल्याची घटना घडली.

 

प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात सुमारे १७ जण जखमी झाले असून त्यापैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर सदर बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या लोकांनी घटनास्थळाहून काढता पाय घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. घटनास्थळी स्थानिक प्रशासन, पोलिस आणि एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झाली आहे.

यासंदर्भात नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर म्हणाले की, या अपघातात एकूण १७ जण जखमी झाले आहेत. जखमींना ३ खासगी रुग्णालयात हलवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान सदर बांधकामाचे कंत्राट कुठल्या कंपनीचे आहे याबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात असून त्यासंदर्भात कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या