भारताच्या संरक्षण उत्पादनात विक्रमी वाढ

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक्स पोस्ट करुन ही माहिती दिली आहे.



भारताने २०२४-२५ या आर्थिक वर्षात एक लाख ५० हजार ५९० कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्याचे उत्पादन केले. याआधी २०२३ - २४ या आर्थिक वर्षात भारताने एक लाख २७ हजार कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्याचे उत्पादन केले होते. देशाच्या संरक्षण साहित्याच्या उत्पादनात १८ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही एक उल्लेखनीय बाब आहे. याआधी २०१९ - २० या आर्थिक वर्षात भारताने ७९ हजार ०७१ कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्याचे उत्पादन केले होते. सोप्या शब्दात सांगायचे तर अवघ्या पाच वर्षांमध्ये भारताच्या संरक्षण साहित्याच्या उत्पादनात ९० टक्क्यांची वाढ झाली आहे. ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. या ऐतिहासिक कामगिरीची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक्स पोस्ट करुन दिली.

भारत सरकार, संरक्षण साहित्यासाठी संशोधन करणाऱ्या सरकारी आणि खासगी प्रयोगशाळा, संरक्षण साहित्याचे उत्पादन करणारे सरकारी आणि खासगी कारखाने तसेच या कारखान्यांना मदत करणारे इतर लहान - मोठे कारखाने या सर्वांच्या संघटीत प्रयत्नांमुळेच देशाने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ही सांघिक कामगिरी आहे. या कामगिरीमुळे हे सिद्ध होते की भारत संरक्षण साहित्याच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यास सक्षम आहे. देशाने संरक्षण साहित्याच्या क्षेत्रात नवनवे विक्रम करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच आपण आणखी मोठी भरारी घेऊ, असाही विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक्स पोस्टद्वारे व्यक्त केला आहे.

भारताच्या संरक्षण साहित्य उत्पादनाच्या क्षेत्रात सरकारी कंपन्यांचा वाटा ७७ टक्के आणि खासगी कंपन्यांचा वाटा २३ टक्के आहे. देशाच्या संरक्षण साहित्य उत्पादनाच्या क्षेत्रात खासगी कंपन्यांचा वाटा मागील आर्थिक वर्षात २१ टक्के होता, जो आता दोन टक्क्यांनी वाढला आहे.
Comments
Add Comment

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ