भारताच्या संरक्षण उत्पादनात विक्रमी वाढ

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक्स पोस्ट करुन ही माहिती दिली आहे.



भारताने २०२४-२५ या आर्थिक वर्षात एक लाख ५० हजार ५९० कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्याचे उत्पादन केले. याआधी २०२३ - २४ या आर्थिक वर्षात भारताने एक लाख २७ हजार कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्याचे उत्पादन केले होते. देशाच्या संरक्षण साहित्याच्या उत्पादनात १८ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही एक उल्लेखनीय बाब आहे. याआधी २०१९ - २० या आर्थिक वर्षात भारताने ७९ हजार ०७१ कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्याचे उत्पादन केले होते. सोप्या शब्दात सांगायचे तर अवघ्या पाच वर्षांमध्ये भारताच्या संरक्षण साहित्याच्या उत्पादनात ९० टक्क्यांची वाढ झाली आहे. ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. या ऐतिहासिक कामगिरीची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक्स पोस्ट करुन दिली.

भारत सरकार, संरक्षण साहित्यासाठी संशोधन करणाऱ्या सरकारी आणि खासगी प्रयोगशाळा, संरक्षण साहित्याचे उत्पादन करणारे सरकारी आणि खासगी कारखाने तसेच या कारखान्यांना मदत करणारे इतर लहान - मोठे कारखाने या सर्वांच्या संघटीत प्रयत्नांमुळेच देशाने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ही सांघिक कामगिरी आहे. या कामगिरीमुळे हे सिद्ध होते की भारत संरक्षण साहित्याच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यास सक्षम आहे. देशाने संरक्षण साहित्याच्या क्षेत्रात नवनवे विक्रम करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच आपण आणखी मोठी भरारी घेऊ, असाही विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक्स पोस्टद्वारे व्यक्त केला आहे.

भारताच्या संरक्षण साहित्य उत्पादनाच्या क्षेत्रात सरकारी कंपन्यांचा वाटा ७७ टक्के आणि खासगी कंपन्यांचा वाटा २३ टक्के आहे. देशाच्या संरक्षण साहित्य उत्पादनाच्या क्षेत्रात खासगी कंपन्यांचा वाटा मागील आर्थिक वर्षात २१ टक्के होता, जो आता दोन टक्क्यांनी वाढला आहे.
Comments
Add Comment

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या