सणासुदीच्या काळात रेल्वेची नवीन ऑफर... दोन्ही रेल्वे तिकिटांच्या बुकिंगवर २०% सूट

नवी दिल्ली: रेल्वेने प्रवाशांसाठी राउंड ट्रिप पॅकेज योजना सुरू केली आहे, ज्याअंतर्गत परतीच्या प्रवासात २०% सूट दिली जाईल. ही योजना सध्या प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात आली आहे, जेणेकरून त्याचा परिणाम आणि प्रवाशांच्या प्रतिसादाचे मूल्यांकन करता येईल. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


रेल्वेने सणासुदीच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी 'राउंड ट्रिप पॅकेज' योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत, निर्धारित वेळेच्या मर्यादेत परतीचा प्रवास बुक करणाऱ्या प्रवाशांना रिटर्न तिकिटाच्या मूळ भाड्यावर २०% सूट मिळेल.



'कनेक्टिंग जर्नी फीचर' द्वारे तिकिटे बुक 


ही योजना १४ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होईल. याअंतर्गत, प्रथम १३ ऑक्टोबर २०२५ ते २६ ऑक्टोबर २०२५ दरम्यानच्या तारखेसाठी ऑनवर्ड जर्नीचे तिकीट बुक करावे लागेल. त्यानंतर, १७ नोव्हेंबर २०२५ ते १ डिसेंबर २०२५ दरम्यानच्या तारखेसाठी 'कनेक्टिंग जर्नी फीचर' द्वारे परतीचे तिकीट बुक करता येईल.



बेस फेअरवर सवलत उपलब्ध 


या योजनेत दोन्ही बाजूंचे तिकीट एकाच प्रवाशांच्या नावाने कन्फर्म केले असेल तरच सवलत मिळेल. परतीचे तिकीट बुक करण्यासाठी आगाऊ आरक्षण कालावधी लागू होणार नाही. परतीच्या प्रवासाच्या मूळ भाड्यावरच सवलत दिली जाईल. रेल्वेने सांगितले की, ही योजना सध्या प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आली आहे, जेणेकरून सणांच्या काळात दोन्ही बाजूंनी गाड्यांचा वापर चांगल्या प्रकारे करता येईल.

Comments
Add Comment

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या

एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक

सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासा नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

प्रवाशांचा संताप ! 'इंडिगो'विरुद्ध सामूहिक भरपाईची मागणी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विमानांच्या

नवीन कामगार कायद्यांमुळे वेतन कमी होणार नाही; केंद्राचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : देशात नवीन कामगार कायदे लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होईल, अशी चिंता सध्या

पश्चिम बंगालमध्ये ५८.८ लाख मतदारांची नावे यादीतून वगळणार

कोलकाता : २०२६ पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार