सणासुदीच्या काळात रेल्वेची नवीन ऑफर... दोन्ही रेल्वे तिकिटांच्या बुकिंगवर २०% सूट

नवी दिल्ली: रेल्वेने प्रवाशांसाठी राउंड ट्रिप पॅकेज योजना सुरू केली आहे, ज्याअंतर्गत परतीच्या प्रवासात २०% सूट दिली जाईल. ही योजना सध्या प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात आली आहे, जेणेकरून त्याचा परिणाम आणि प्रवाशांच्या प्रतिसादाचे मूल्यांकन करता येईल. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


रेल्वेने सणासुदीच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी 'राउंड ट्रिप पॅकेज' योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत, निर्धारित वेळेच्या मर्यादेत परतीचा प्रवास बुक करणाऱ्या प्रवाशांना रिटर्न तिकिटाच्या मूळ भाड्यावर २०% सूट मिळेल.



'कनेक्टिंग जर्नी फीचर' द्वारे तिकिटे बुक 


ही योजना १४ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होईल. याअंतर्गत, प्रथम १३ ऑक्टोबर २०२५ ते २६ ऑक्टोबर २०२५ दरम्यानच्या तारखेसाठी ऑनवर्ड जर्नीचे तिकीट बुक करावे लागेल. त्यानंतर, १७ नोव्हेंबर २०२५ ते १ डिसेंबर २०२५ दरम्यानच्या तारखेसाठी 'कनेक्टिंग जर्नी फीचर' द्वारे परतीचे तिकीट बुक करता येईल.



बेस फेअरवर सवलत उपलब्ध 


या योजनेत दोन्ही बाजूंचे तिकीट एकाच प्रवाशांच्या नावाने कन्फर्म केले असेल तरच सवलत मिळेल. परतीचे तिकीट बुक करण्यासाठी आगाऊ आरक्षण कालावधी लागू होणार नाही. परतीच्या प्रवासाच्या मूळ भाड्यावरच सवलत दिली जाईल. रेल्वेने सांगितले की, ही योजना सध्या प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आली आहे, जेणेकरून सणांच्या काळात दोन्ही बाजूंनी गाड्यांचा वापर चांगल्या प्रकारे करता येईल.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही