चीनमधील तरुण-तरुणी AI पार्टनर गेल्याच्या दुखात, Cyber ​​Widowhood आहे तरी काय?

नवी दिल्ली: चीनमधील एक संकल्पना सध्या जगभराचं लक्ष वेधून घेत आहे. या संकल्पनेचं नाव आहे Cyber Widowhood. म्हणजेच सायबर वैधव्य. चीनमध्ये कित्येक तरुण सध्या दु:खात आहेत. आपला जोडीदार गेल्यावर जो त्रास एखाद्या व्यक्तीला सहन करावा लागतो, अगदी तसाच त्रास या तरुणांना होत आहे. चीनमधील कित्येक तरुण-तरुणी 'एआय कम्पॅनियन'च्या प्रेमात आहेत. ते याच एआयसोबत गप्पा मारतात, भावनिक आधार देतात आणि त्यांच्याशी रोमान्सही करतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीप्रमाणे AI Companion त्यांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग होऊन जातो.


चीनमधील तरुण पिढी सध्या मोठ्या प्रमाणात 'एआय कम्पॅनियन' (AI Companion) अ‍ॅप्सचा वापर करत आहे. हे अ‍ॅप्स वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीनुसार, स्वभावानुसार आणि दिसण्यानुसार एक आभासी (Virtual) जोडीदार तयार करून देतात. एका तंत्रज्ञानाने हा पार्टनर तयार केलेला असल्याने तो वापरकर्त्यासाठी अगदी साजेसा असतो. हा 'एआय कम्पॅनियन' त्यांना सर्व गोष्टीत साध देतात. भावनिक आधार देतात. त्यांच्या सुख-दुखात आभासी पद्धतीने सहभागी होतात. मात्र ज्यावेळी 'एआय कम्पॅनियन' अॅप अपडेट होतो किंवा काही तांत्रिक कारणांमुळे ते पात्र डिलिट होतं त्यावेळी मात्र अनेक तरुण-तरुणी आपल्या 'एआय कम्पॅनियन'च्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतात.



मानसिक त्रास आणि एकटेपणा जाणविण्याची भीती...



तंत्रज्ञान बदलले तरी माणसाची भावनिक आधाराची गरज तीच आहे. फरक इतकाच आहे की, आता एआयमुळे हे जोडीदार अधिक वास्तववादी वाटू लागले आहेत. काही तज्ज्ञांच्या मते यापूर्वीही ओटोम गेम्स' (Otome games) किंवा भाड्याने व्हर्च्युअल बॉयफ्रेंड मिळण्याच्या सुविधा उपलब्ध होत्या. मात्र प्रत्यक्षात व्यक्तीशी संवाद साधण्याऐवजी एआयवर अवलंबून राहणं योग्य नाही असं अनेकांचं म्हणणं आहे. तंत्रज्ञानालाही मर्यादा आहेत. मात्र एआयवर अतिरिक्त अवलंबून राहिल्याने तीव्र मानसिक त्रास आणि एकटेपणा जाणवू शकतो. प्रत्यक्षात नातेसंबंधात गुंतागुंत असते, मात्र एआय नेहमी वापरकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागतो. परिणामी लोक वास्तवापासून दूर जातात.

Comments
Add Comment

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू

India Iran Relations : खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला परराष्ट्र राज्यमंत्री आणि बिहारचे राज्यपाल राहणार उपस्थित

नवी दिल्ली : इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली खामेनेई यांच्या राजकीय अंत्यसंस्कार सोहळ्यात

Rajya Sabha : राज्यसभेच्या आठ नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

नवी दिल्ली : राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन(CP Radhkrushna) यांनी सोमवारी राज्यसभेच्या सात नवनिर्वाचित आणि

Presidential Award : ऑपरेशन सिंदूर”सह विविध मोहिमांतील वीरांना सन्मान

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी राष्ट्रपती भवनात आयोजित संरक्षण अलंकरण समारंभात