आंबेगावमध्ये सोयाबीनवर बुरशीचे संकट

भाव पडल्याने शेतकऱ्यांचा डोक्याला हात


महाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ, चास, थोरांदळे, जाधववाडी, लौकी, गिरवली, एकलहरे, विठ्ठलवाडी, टाकेवाडी ग्रामपंचायत क्षेत्रातील सोयाबीन पिकाला बुरशी व कीड रोगाची लागण झाली आहे. पाऊस नसल्याने रोपे करपून गेली आहेत. पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने डोक्याला हात लावला आहे. औषधफवारणी व खतांचा खर्च परवडत नसल्याचे शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यात सुमारे ३ हजार ८४५ हेक्टरवर सोयाबीन पीक घेण्यात आले आहे.


पावसामुळे जमिनीत ओलाव्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे बुरशी रोगाचा प्रादुर्भाव सर्व पिकांवर आढळून आला आहे. सोयाबीन पिकाच्या मुळ्या हुमणी खात आहेत. त्यामुळे सोयाबीनची पिके पार सुकून गेली आहेत. त्यामुळे संपूर्ण झाड वाया जाते. पावसाने ओढ दिल्याने पेरणी करण्यात आलेले सोयाबीन पिवळे पडले आहे. पिकाला मागील काही वर्षांच्या तुलनेत अतिशय कमी ४० रु.प्रति किलो बाजारभाव मिळाला आहे. शासनामार्फत खरेदी करण्यात येणारे सोयाबीन ठरावीक जिल्ह्यातच खरेदी केले गेले. हजारो क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या कोठारात पडून आहे. नव्याने सोयाबीनची पेरणी करण्यात आली. त्यावर महागड्या औषधांची फवारणी करणे परवडत नाही अशी खंत शेतकरी व्यक्त करतात.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार