आंबेगावमध्ये सोयाबीनवर बुरशीचे संकट

भाव पडल्याने शेतकऱ्यांचा डोक्याला हात


महाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ, चास, थोरांदळे, जाधववाडी, लौकी, गिरवली, एकलहरे, विठ्ठलवाडी, टाकेवाडी ग्रामपंचायत क्षेत्रातील सोयाबीन पिकाला बुरशी व कीड रोगाची लागण झाली आहे. पाऊस नसल्याने रोपे करपून गेली आहेत. पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने डोक्याला हात लावला आहे. औषधफवारणी व खतांचा खर्च परवडत नसल्याचे शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यात सुमारे ३ हजार ८४५ हेक्टरवर सोयाबीन पीक घेण्यात आले आहे.


पावसामुळे जमिनीत ओलाव्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे बुरशी रोगाचा प्रादुर्भाव सर्व पिकांवर आढळून आला आहे. सोयाबीन पिकाच्या मुळ्या हुमणी खात आहेत. त्यामुळे सोयाबीनची पिके पार सुकून गेली आहेत. त्यामुळे संपूर्ण झाड वाया जाते. पावसाने ओढ दिल्याने पेरणी करण्यात आलेले सोयाबीन पिवळे पडले आहे. पिकाला मागील काही वर्षांच्या तुलनेत अतिशय कमी ४० रु.प्रति किलो बाजारभाव मिळाला आहे. शासनामार्फत खरेदी करण्यात येणारे सोयाबीन ठरावीक जिल्ह्यातच खरेदी केले गेले. हजारो क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या कोठारात पडून आहे. नव्याने सोयाबीनची पेरणी करण्यात आली. त्यावर महागड्या औषधांची फवारणी करणे परवडत नाही अशी खंत शेतकरी व्यक्त करतात.

Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ