आंबेगावमध्ये सोयाबीनवर बुरशीचे संकट

भाव पडल्याने शेतकऱ्यांचा डोक्याला हात


महाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ, चास, थोरांदळे, जाधववाडी, लौकी, गिरवली, एकलहरे, विठ्ठलवाडी, टाकेवाडी ग्रामपंचायत क्षेत्रातील सोयाबीन पिकाला बुरशी व कीड रोगाची लागण झाली आहे. पाऊस नसल्याने रोपे करपून गेली आहेत. पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने डोक्याला हात लावला आहे. औषधफवारणी व खतांचा खर्च परवडत नसल्याचे शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यात सुमारे ३ हजार ८४५ हेक्टरवर सोयाबीन पीक घेण्यात आले आहे.


पावसामुळे जमिनीत ओलाव्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे बुरशी रोगाचा प्रादुर्भाव सर्व पिकांवर आढळून आला आहे. सोयाबीन पिकाच्या मुळ्या हुमणी खात आहेत. त्यामुळे सोयाबीनची पिके पार सुकून गेली आहेत. त्यामुळे संपूर्ण झाड वाया जाते. पावसाने ओढ दिल्याने पेरणी करण्यात आलेले सोयाबीन पिवळे पडले आहे. पिकाला मागील काही वर्षांच्या तुलनेत अतिशय कमी ४० रु.प्रति किलो बाजारभाव मिळाला आहे. शासनामार्फत खरेदी करण्यात येणारे सोयाबीन ठरावीक जिल्ह्यातच खरेदी केले गेले. हजारो क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या कोठारात पडून आहे. नव्याने सोयाबीनची पेरणी करण्यात आली. त्यावर महागड्या औषधांची फवारणी करणे परवडत नाही अशी खंत शेतकरी व्यक्त करतात.

Comments
Add Comment

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,