निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: ३३४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

नवी दिल्ली: देशातील निवडणूक प्रक्रिया अधिक स्वच्छ आणि पारदर्शक बनवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आयोगाने ३३४ मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे. निवडणूक प्रणालीतील शुद्धीकरणाचा हा एक भाग असल्याचे आयोगाने म्हटले आहे.



काय आहेत नियम?


निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, नोंदणीकृत राजकीय पक्षांनी प्रत्येक सहा वर्षांतून किमान एकदा तरी निवडणूक लढवणे अनिवार्य आहे. याशिवाय, पक्षाच्या कोणत्याही बदलाची माहिती आयोगाला देणेही बंधनकारक आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या पक्षांवर ही कारवाई करण्यात आली आहे.



जून महिन्यात आयोगाने ३४५ पक्षांच्या नियमांचे पालन तपासण्यासाठी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. या तपासणीत ३३४ पक्षांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले. उर्वरित काही प्रकरणे पुढील पडताळणीसाठी पाठवण्यात आली आहेत.


या कारवाईनंतर आता देशात एकूण ६ राष्ट्रीय, ६७ राज्यस्तरीय आणि २,५२० नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेले राजकीय पक्ष अस्तित्वात राहतील.

Comments
Add Comment

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या