निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: ३३४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

नवी दिल्ली: देशातील निवडणूक प्रक्रिया अधिक स्वच्छ आणि पारदर्शक बनवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आयोगाने ३३४ मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे. निवडणूक प्रणालीतील शुद्धीकरणाचा हा एक भाग असल्याचे आयोगाने म्हटले आहे.



काय आहेत नियम?


निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, नोंदणीकृत राजकीय पक्षांनी प्रत्येक सहा वर्षांतून किमान एकदा तरी निवडणूक लढवणे अनिवार्य आहे. याशिवाय, पक्षाच्या कोणत्याही बदलाची माहिती आयोगाला देणेही बंधनकारक आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या पक्षांवर ही कारवाई करण्यात आली आहे.



जून महिन्यात आयोगाने ३४५ पक्षांच्या नियमांचे पालन तपासण्यासाठी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. या तपासणीत ३३४ पक्षांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले. उर्वरित काही प्रकरणे पुढील पडताळणीसाठी पाठवण्यात आली आहेत.


या कारवाईनंतर आता देशात एकूण ६ राष्ट्रीय, ६७ राज्यस्तरीय आणि २,५२० नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेले राजकीय पक्ष अस्तित्वात राहतील.

Comments
Add Comment

Indian Space Station : 2035 पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक; गगनयान मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात

मुंबई : भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांना वेग आला असून, 2035 पर्यंत देशाचे स्वतःचे अंतराळ स्थानक (भारतीय

India Weather : मुसळधार पाऊस थांबायचं नाव घेईना! देशातील 17 राज्यांना हाय अलर्टचा इशारा; आसाममधील पूरस्थिती गंभीर

मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या

Mark Zuckerberg Apology : मेटाला PM मोदींचा व्हिडिओ हटवणे भोवले; केंद्र सरकार आक्रमक, झुकरबर्ग यांनी मागितली माफी

NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणी दिल्लीतील जंतरमंतर येथे देशभरातून आंदोलनाचा भडका उडाला होता. या गंभीर पार्श्वभूमीवर

Foreigners Banned In Indian City : इंग्रजांनी वसवलेलं 'हे' निसर्गरम्य शहर; पण आज तिथेच परदेशी पर्यटकांना बंदी का ? कारण काय ?

देवभूमी म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड हे राज्य आपल्या निसर्गरम्य दऱ्या, शांत पर्वत आणि अप्रतिम निसर्ग