महापालिकेत पुन्हा ११५ नगरसेवक बसणार

प्रभाग रचना प्रारूप आराखडा शासनाकडे सादर


प्रभागांची २९ संख्याही कायम


विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून, मंजुरीसाठी नगरविकास मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. २०१७ मध्ये असलेल्या प्रभाग रचनेप्रमाणेच याहीवेळी प्रभाग रचना करण्यात आल्याने निवडणुकीसाठी २९ प्रभाग राहणार असून, ११५ एवढीच नगरसेवक संख्या सुद्धा कायम असणार आहे.


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार प्रभाग रचना प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश निवडणूक आयोग आणि शासनाकडून संबंधित यंत्रणांना देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने प्रभागांची रचना कशा प्रकारे करण्यात यावी यासंदर्भात परिपत्रक काढून जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना कळविले आहे. वसई-विरार महापालिका 'क' वर्गामध्ये मोडत असल्याने येथील प्रभागांची रचना महापालिका आयुक्तांकडून केल्या जात आहे.


दरम्यान, निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार वसई-विरार शहर पालिकेने आरक्षित प्रभागांची जाहीर सोडत यापूर्वी २१ मे २०२२ रोजी काढली होती व प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध करून त्यावर १ जून ते ६ जून २०२२ या कालावधीमध्ये हरकती व सूचना मागविण्यात आल्या. त्यानंतर १३ मे २०२२ रोजी पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ आरक्षणाची अधिसूचना महापालिकेने प्रसिद्ध केली. त्यावेळी सदस्य संख्या ११ ने वाढवून १२६ करण्यात आली होती. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसी जागांचा मुद्दा निवडणुकीसाठी निकाली निघाला आहे. चार सदस्यांचा एक प्रभाग अशाप्रकारे २०१७ मध्ये ज्या प्रमाणे प्रभागांची रचना करण्यात आली. त्याचप्रमाणे प्रभागरचना प्रारूप आराखडा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीसाठी २९ प्रभागांची रचना करण्यात आली असून, प्रारूप आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला आहे. २८ प्रभागात चार नगरसेवक तर २९ व्या प्रभागात ३ अशाप्रकारे २९ प्रभागात ११५ नगरसेवकांसाठी वसई विरार महापालिकेची निवडणूक होणार आहे. महापालिकेकडून पाठविण्यात आलेल्या प्रभाग रचना प्रारूप आराखड्याला २१ ऑगस्टपर्यंत निवडणूक आयोगाकडून मान्यता घ्यावी लागणार आहे.

Comments
Add Comment

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही

Virar: दारूच्या नशेत सापासोबत मस्ती बेतली जीवावर; विरारमध्ये तरुणाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

विरार: दारूच्या नशेत विषारी जातीच्या सापाला पकडणे आणि अति उत्साहाच्या भरात सापसोबतच मस्ती करणे विरार येथील एका