एसटी महामंडळाच्या राखी पौर्णिमेसाठी ४० जादा गाड्या कार्यरत

लाडक्या बहिणींसाठी ८, ९ आणि ११ ऑगस्ट रोजी बसची विशेष सेवा


पेण(स्वप्नील पाटील) : आधीच लाडक्या बहिणींना एसटी तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत जाहीर केल्यानंतर असंख्य लाडक्या बहिणी एसटीचा प्रवास करताना दिसत आहे. मात्र आता याच बहिणींना एसटी महामंडळाने आणखी एक खुशखबर दिली.


आपल्या लाडक्या भाऊरायला राखी बांधायला जाताना त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी रायगड एसटी महामंडळाने ८, ९ आणि ११ ऑगस्ट रोजी ४० जादा गाड्या कार्यरत ठेवण्याची घोषणा केली आहे. ८ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा, ९ तारखेला राखी पौर्णिमा तर ११ तारखेला परतीचा प्रवास असल्याने या तीन दिवसांसाठी एसटी महामंडळाने या जादा बसेस सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.


रायगड आगारातील महाड, अलिबाग, पेण, श्रीवर्धन, कर्जत, रोहा, मुरुड आणि माणगाव या आठही आगारातून या बसेस सुटणार असून ४० जादा गाड्यांच्या माध्यमातून १२८ जादा फेऱ्या आणि या फेऱ्यांमधून एसटीचा १५०५६.८ किलोमीटरचा जादा प्रवास करण्यात येणार आहे.



त्यामुळे लाडक्या बहिणींना तिकिटात पन्नास टक्के सवलतीसह आता भाऊरायला राखी बांधायला जाताना जादा गाड्यादेखील मिळत असल्याने त्या दिवशीच्या वाढत्या प्रवासी गर्दीतून थोडीफार सुटका मिळणार आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे