PM Modi : ट्रम्पच्या धमक्यांना मोदींचं एका वाक्यात उत्तर : "शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार"

अमेरिकेच्या ५०% टॅरिफवर मोदींचा ठाम पवित्रा


नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचा निर्णय घेतला असून यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. “भारत शेतकरी आणि मच्छीमार यांच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठणकावून सांगितलं. “या भूमिकेची मला वैयक्तिक किंमत चुकवावी लागू शकते, पण मी ती किंमत मोजायला तयार आहे,” असंही मोदींनी स्पष्ट केलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही दिवसांपासून भारतावर टॅरिफ लावण्याची सातत्याने धमकी दिली होती. या महिन्याच्या सुरुवातीला २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा करण्यात आली होती, आणि आता थेट ५० टक्क्यांपर्यंत शुल्क वाढवण्यात आलं आहे.


अमेरिकेने काल रात्री भारतावर ५० टक्के आयात शुल्क लावण्याची अधिकृत घोषणा केली. गेल्या काही काळापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सातत्याने सार्वजनिक मंचांवर भारतावर टॅरिफ लावण्याबाबत वक्तव्य करत होते. दरम्यान, भारताने सार्वजनिकपणे प्रतिक्रिया देण्याचे टाळले आणि चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु डेअरी आणि कृषी क्षेत्र खुलं करण्याच्या अमेरिकेच्या मागणीला भारताने स्पष्ट नकार दिला. यामुळे दोन्ही देशांमधील ट्रेड डील फिस्कटल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताने यावर आपली भूमिका ठामपणे मांडताना, "या क्षेत्रांमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही," असा संदेश दिला आहे.





“शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार” 


हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.
ते म्हणाले, “भारतातील शेतकरी, मच्छीमार आणि डेअरी शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या भूमिकेसाठी मला वैयक्तिक पातळीवर मोठी किंमत चुकवावी लागेल, पण मी यासाठी तयार आहे.” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.



शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हे आमचं लक्ष्य : पंतप्रधान मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालकांच्या हितासाठी सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आहे. “माझ्या देशातील मच्छीमार, पशुपालक आणि शेतकऱ्यांसाठी भारत कटिबद्ध आहे. शेतीचा खर्च कमी करणं, उत्पन्न वाढवणं आणि नव्या संधी निर्माण करणं हे आमचं ध्येय आहे. शेतकऱ्यांची ताकद हीच देशाच्या प्रगतीचा खरा आधार आहे,” असं मोदी म्हणाले.

Comments
Add Comment

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा

Delhi: हातात पुष्पगुच्छ घेऊन थेट शिरला विधानसभेत, अध्यक्षांच्या गाडीजवळ फुलांचा गुच्छ ठेवला अन्...

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठा भंग झाल्याचे वृत्त आहे. एका वाहनाने बॅरियर तोडून गेट क्रमांक २ मधून

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

Crime News : पाटण्यात माणुसकीला काळीमा; सख्ख्या काकाकडूनच ३ वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परसा बाजार

Ladakh: लिलावात २५ हजार रुपयांना विकले गेले १० रुपये किमतीचे अंडे; इराणी पीडितांसाठीचा अनोखा उपक्रम चर्चेत

नवी दिल्ली: लडाखमधील लेह जिल्ह्यातील लोक इराणच्या लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. युद्धाच्या काळात

Delhi: पार्किंगवरून महिला उपनिरीक्षक आणि वृद्ध व्यक्तीमध्ये वाद, पोलिसांनी काय कारवाई केली?

दिल्ली: दिल्लीतील उत्तर रोहिणी परिसरात पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. मिळालेल्या