PM Modi : ट्रम्पच्या धमक्यांना मोदींचं एका वाक्यात उत्तर : "शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार"

अमेरिकेच्या ५०% टॅरिफवर मोदींचा ठाम पवित्रा


नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचा निर्णय घेतला असून यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. “भारत शेतकरी आणि मच्छीमार यांच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठणकावून सांगितलं. “या भूमिकेची मला वैयक्तिक किंमत चुकवावी लागू शकते, पण मी ती किंमत मोजायला तयार आहे,” असंही मोदींनी स्पष्ट केलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही दिवसांपासून भारतावर टॅरिफ लावण्याची सातत्याने धमकी दिली होती. या महिन्याच्या सुरुवातीला २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा करण्यात आली होती, आणि आता थेट ५० टक्क्यांपर्यंत शुल्क वाढवण्यात आलं आहे.


अमेरिकेने काल रात्री भारतावर ५० टक्के आयात शुल्क लावण्याची अधिकृत घोषणा केली. गेल्या काही काळापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सातत्याने सार्वजनिक मंचांवर भारतावर टॅरिफ लावण्याबाबत वक्तव्य करत होते. दरम्यान, भारताने सार्वजनिकपणे प्रतिक्रिया देण्याचे टाळले आणि चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु डेअरी आणि कृषी क्षेत्र खुलं करण्याच्या अमेरिकेच्या मागणीला भारताने स्पष्ट नकार दिला. यामुळे दोन्ही देशांमधील ट्रेड डील फिस्कटल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताने यावर आपली भूमिका ठामपणे मांडताना, "या क्षेत्रांमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही," असा संदेश दिला आहे.





“शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार” 


हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.
ते म्हणाले, “भारतातील शेतकरी, मच्छीमार आणि डेअरी शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या भूमिकेसाठी मला वैयक्तिक पातळीवर मोठी किंमत चुकवावी लागेल, पण मी यासाठी तयार आहे.” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.



शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हे आमचं लक्ष्य : पंतप्रधान मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालकांच्या हितासाठी सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आहे. “माझ्या देशातील मच्छीमार, पशुपालक आणि शेतकऱ्यांसाठी भारत कटिबद्ध आहे. शेतीचा खर्च कमी करणं, उत्पन्न वाढवणं आणि नव्या संधी निर्माण करणं हे आमचं ध्येय आहे. शेतकऱ्यांची ताकद हीच देशाच्या प्रगतीचा खरा आधार आहे,” असं मोदी म्हणाले.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने