नागपूर - पुणे वंदे भारत या दिवसापासून धावणार

नागपूर : नागपूर (अजनी) ते पुणे आणि पुणे ते नागपूर (अजनी) अशी वंदे भारत एक्सप्रेस रविवार १० ऑगस्ट २०२५ पासून धावणार आहे. यामुळे नागपूर (अजनी) ते पुणे हा प्रवास बारा तासांत होणार आहे. प्रवासाचा वेळ तीन तासांनी कमी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी या वंदे भारत एक्सप्रेसचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार आहेत.

नागपूर (अजनी) ते पुणे हे रेल्वेद्वारे ८९० किमी.चे अंतर वंदे भारत एक्सप्रेस बारा तासांत पूर्ण करेल. मागणी स्पीपर गाडीची होती पण सध्या चेअरकार सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. नियोजनानुसार नागपूर (अजनी) ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस नागपूरहून सकाळी ९.५० वाजता सुटेल आणि पुण्याकडे रवाना होईल. गाडी रात्री नऊ वाजून ५० मिनिटांनी पुण्याला पोहोचेल. सोमवारी सकाळी सहा वाजून २५ मिनिटांनी पुण्यातून नागपूरसाठी ही ‘वंदे भारत’ सुटेल. ती संध्याकाळी सहा वाजून २५ मिनिटांनी (अजनी) नागपूरमध्ये पोहोचेल. आठवड्यातून सहा दिवस ही गाडी धावणार असून, नागपूरहून दर सोमवारी आणि पुण्यातून दर गुरुवारी ही गाडी रद्द असेल.

पुण्याहून नागपूरला वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी मागील दीड वर्षापासून होत होती. या मागणीची दखल घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गाडी सुरू करण्याचे निर्देश दिले. दोन्ही शहरांदरम्यान प्रवासाचा वेळ कमी होणार असल्यामुळे या गाडीला चांगली पसंती मिळेल, अशी अपेक्षा आहे. सध्या पुण्यातून सोलापूर, कोल्हापूर आणि हुबळी या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. नागपूरची गाडी सुरू झाल्यानंतर त्यात आणखी भर पडणार आहे.
Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या