Gadchiroli Accident News : रस्त्यावर व्यायाम करत होते अन् भरधाव ट्रकनं चिरडलं; गडचिरोलीत ६ मुले ट्रकखाली, चौघांचा जागीच मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या कडेला व्यायाम करत असलेल्या ६ मुलांना भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात ट्रकने चिरडलं. या दुर्घटनेत ४ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, इतर दोघांवर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संतापजनक बाब म्हणजे, या अपघातात दोन मुलांचा मृत्यू घटनास्थळीच झाला, तर उर्वरित दोन मुलांचा गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर काटली गावात शोककळा पसरली असून, संतप्त ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.




व्यायामासाठी गेलेल्या मुलांचा मृत्य


मिळालेल्या माहितीनुसार, ही ६ मुले रस्त्यावर व्यायाम करत होती, मात्र अचानक भरधाव ट्रकने सहा मुलांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दोन मुलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान गडचिरोली जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. उर्वरित दोघांवर गंभीर अवस्थेत नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी नेहमीप्रमाणे व्यायामासाठी बाहेर पडलेल्या या मुलांवर काळाने घाला घातल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.



गडचिरोली अपघातग्रस्त कुटुंबांना ४ लाखांची मदत




गडचिरोलीतील भीषण अपघातानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेबाबत तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हंटल, “गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर झालेल्या अपघातात चार युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.” फडणवीस पुढे म्हणाले की, “अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना तातडीने नागपूरला हलवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली असून पुढच्या एक तासात त्यांना पुढील उपचारासाठी हलवले जाईल.” राज्य सरकारकडून जखमींच्या संपूर्ण उपचाराचा खर्च उचलण्यात येणार असल्याचीही माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.


Comments
Add Comment

पुण्यातील कचरावेचक कामगार अंजू माने यांनी १० लाखांची बॅग परत करून दिला मानवतेचा संदेश

पुणे : जिथे दैनंदिन जीवनात पैशासाठी लोक अनेकदा अनैतिक मार्ग स्वीकारताना दिसतात, तिथे पुण्यातील एका मेहनती

Local Train Block : मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवसांचा ब्लॉक! चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी: 'या' लोकल रद्द, घरातून निघण्यापूर्वी 'हे' वेळापत्रक तपासा!

मुंबई : मुंबईच्या लाखो चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. रेल्वे

Mahim Station Fire : हार्बर लाईन सेवा ठप्प! माहिम रेल्वेस्थानकाजवळ नवरंग कंपाऊंडमध्ये मोठी आग; लोकल वाहतुकीवर परिणाम, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात आज, २२ नोव्हेंबर रोजी माहिम रेल्वे स्थानकाजवळ एक मोठी आग लागल्याची गंभीर घटना

भायखळ्यात उबाठा आणि शिवसेनेतच होणार लढाई, कोणत्या जागांवर असेल, कुणाचा पत्ता कापला जाणार? जाणून घ्या

मुंबई (सचिन धानजी) : दक्षिण मुंबईतील भायखळा विधानसभेत उबाठाचे मनोज जामसूतकर हे आमदार म्हणून निवडून आले. लोकसभा

पवई तलावातील जल प्रदूषण रोखणार, ईस्ट इंडिया कंपनीची महापालिकेने केली निवड

मुंबई (सचिन धानजी): पवई तलावात होणारे मलमिश्रित सांडपाण्याचे प्रदुषण कमी करण्यासाठी आता पवई येथील सध्या बंद

महापालिका निवडणूक प्रभाग आरक्षणावर आल्या फक्त १२९ हरकती सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकी करता प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती.