Gadchiroli Accident News : रस्त्यावर व्यायाम करत होते अन् भरधाव ट्रकनं चिरडलं; गडचिरोलीत ६ मुले ट्रकखाली, चौघांचा जागीच मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या कडेला व्यायाम करत असलेल्या ६ मुलांना भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात ट्रकने चिरडलं. या दुर्घटनेत ४ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, इतर दोघांवर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संतापजनक बाब म्हणजे, या अपघातात दोन मुलांचा मृत्यू घटनास्थळीच झाला, तर उर्वरित दोन मुलांचा गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर काटली गावात शोककळा पसरली असून, संतप्त ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.




व्यायामासाठी गेलेल्या मुलांचा मृत्य


मिळालेल्या माहितीनुसार, ही ६ मुले रस्त्यावर व्यायाम करत होती, मात्र अचानक भरधाव ट्रकने सहा मुलांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दोन मुलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान गडचिरोली जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. उर्वरित दोघांवर गंभीर अवस्थेत नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी नेहमीप्रमाणे व्यायामासाठी बाहेर पडलेल्या या मुलांवर काळाने घाला घातल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.



गडचिरोली अपघातग्रस्त कुटुंबांना ४ लाखांची मदत




गडचिरोलीतील भीषण अपघातानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेबाबत तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हंटल, “गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर झालेल्या अपघातात चार युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.” फडणवीस पुढे म्हणाले की, “अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना तातडीने नागपूरला हलवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली असून पुढच्या एक तासात त्यांना पुढील उपचारासाठी हलवले जाईल.” राज्य सरकारकडून जखमींच्या संपूर्ण उपचाराचा खर्च उचलण्यात येणार असल्याचीही माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.


Comments
Add Comment

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी

रेल्वे प्रशासनचा मोठा निर्णय ! गर्दी नियंत्रणासाठी उभारणार 'पॅसेंजर होल्डिंग एरिया'; मुंबईमध्ये कोणत्या स्थानकांवर असणार ही सुविधा ?

मुंबई : मुंबईतील वाढत्या गर्दीमुळे नागरिकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा दिवसेंदिवस अपुऱ्या पडत चालल्या आहेत.

Uddhav Thackeray : 'जामीन वॉरंट'ची टांगती तलवार! दोनदा नोटीस देऊनही प्रतिसाद नाही; महामोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंना कोरेगाव भीमा आयोगाकडून 'कारणे दाखवा' नोटीस!

मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), मनसे (MNS) आणि विरोधक (Opposition) उद्या, म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 'सत्याच्या

Farmers News : शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या तारखेवर शिक्कामोर्तब! बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह (Farmers' Loan Waiver) विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी

राणीची बाग ६ नोव्हेंबरला बंद

मुंबई : ‘गुरुनानक जयंती’ निमित्त बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. तसेच, वीरमाता जिजाबाई भोसले