नारळी पौर्णिमेनिमित्ताने वाहतुकीत बदल

ठाणे : कळवा खाडी परिसरात नारळी पौर्णिमेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते या काळात वाहतूक पोलिसांनी शुक्रवारपासून साकेत, कळवा नाका भागात वाहतूक बदल केले आहेत.


ठाणे, कळवा, मुंब्रा भागातील आगरी-कोळी समाज कळवा नाका येथे खाडी परिसरात एकत्र येतात. विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळे या परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त होते. या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी हे बदल केले आहेत. त्यासंदर्भाची अधिसूचना पोलिसांनी प्रसिद्ध केली आहे.
असे असतील बदल :क्रिकनाका येथून उर्जिता उपाहारगृह मार्गे पोलीस मैदान, कोर्टनाक्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना उर्जिका उपाहारगृह येथे प्रवेश बंदी असेल.


येथील वाहने क्रिकनाका, उर्जिता उपाहारगृह येथून ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय, जीपीओ मार्गे प्रवास करतील. साकेत मार्गे सिडकोच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना टीएमटी आणि एनएमएमटीच्या बसगाड्यांना राबोडी वाहतूक उपविभाग कार्यालय येथे प्रवेशबंदी असेल. ठाणे शहरातून कळवा उड्डाणपूलमार्गे नवी मुंबईत जाणाऱ्या खासगी, एसटी बसगाड्यांना कॅडबरी सिग्नल, गोल्डन डाईज नाका आणि खोपट सिग्नल येथे प्रवेशबंदी आहे.


ही वाहने पूर्व द्रुतगती मार्गावरून कॅडबरी सिग्नल येथून कोपरी पूल, मुलुंड टोलनाका, ऐरोली मार्गे किंवा गोल्डन डाईज नाका, खारेगाव टोलनाका, पारसिक नाका मार्गे प्रवास करतील. गोल्डन डाईज नाका येथून जीपीओ मार्गे क्रिक नाका येथे वाहतूक करणाऱ्या चार चाकी, अवजड वाहने आणि मालवाहू वाहनांना गोल्डन डाईज नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने साकेत पूल, खारेगाव टोलनाका, पारसिक चौक मार्गे प्रवास करतील.


तसेच ही वाहने कॅडबरी जंक्शन , कोपरी, मुलुंड टोलनाका, ऐरोली मार्गे देखील वाहतूक करू शकतात. हे वाहतूक बदल शुक्रवारी दुपारी १२ ते रात्री १२ पर्यंत लागू असतील. पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक वाहनांना ही अधिसूचना लागू नसेल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये