नारळी पौर्णिमेनिमित्ताने वाहतुकीत बदल

ठाणे : कळवा खाडी परिसरात नारळी पौर्णिमेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते या काळात वाहतूक पोलिसांनी शुक्रवारपासून साकेत, कळवा नाका भागात वाहतूक बदल केले आहेत.


ठाणे, कळवा, मुंब्रा भागातील आगरी-कोळी समाज कळवा नाका येथे खाडी परिसरात एकत्र येतात. विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळे या परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त होते. या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी हे बदल केले आहेत. त्यासंदर्भाची अधिसूचना पोलिसांनी प्रसिद्ध केली आहे.
असे असतील बदल :क्रिकनाका येथून उर्जिता उपाहारगृह मार्गे पोलीस मैदान, कोर्टनाक्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना उर्जिका उपाहारगृह येथे प्रवेश बंदी असेल.


येथील वाहने क्रिकनाका, उर्जिता उपाहारगृह येथून ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय, जीपीओ मार्गे प्रवास करतील. साकेत मार्गे सिडकोच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना टीएमटी आणि एनएमएमटीच्या बसगाड्यांना राबोडी वाहतूक उपविभाग कार्यालय येथे प्रवेशबंदी असेल. ठाणे शहरातून कळवा उड्डाणपूलमार्गे नवी मुंबईत जाणाऱ्या खासगी, एसटी बसगाड्यांना कॅडबरी सिग्नल, गोल्डन डाईज नाका आणि खोपट सिग्नल येथे प्रवेशबंदी आहे.


ही वाहने पूर्व द्रुतगती मार्गावरून कॅडबरी सिग्नल येथून कोपरी पूल, मुलुंड टोलनाका, ऐरोली मार्गे किंवा गोल्डन डाईज नाका, खारेगाव टोलनाका, पारसिक नाका मार्गे प्रवास करतील. गोल्डन डाईज नाका येथून जीपीओ मार्गे क्रिक नाका येथे वाहतूक करणाऱ्या चार चाकी, अवजड वाहने आणि मालवाहू वाहनांना गोल्डन डाईज नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने साकेत पूल, खारेगाव टोलनाका, पारसिक चौक मार्गे प्रवास करतील.


तसेच ही वाहने कॅडबरी जंक्शन , कोपरी, मुलुंड टोलनाका, ऐरोली मार्गे देखील वाहतूक करू शकतात. हे वाहतूक बदल शुक्रवारी दुपारी १२ ते रात्री १२ पर्यंत लागू असतील. पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक वाहनांना ही अधिसूचना लागू नसेल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरुवात

मुरबाड : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने सन २०२४-२५ या हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांची भातविक्रीसाठी ऑनलाईन

कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उल्हासनगरात उबाठा सेनेला धक्का उल्हासनगर : उल्हासनगरमधील उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून कल्याण

ठाण्यात महाविकास आघाडीची ‘बिघाडी’?

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोट बांधण्यास सुरुवात काँग्रेसच्या ३५ जागा वाटपाच्या मागणीने अधिक तिढा

नवी मुंबईत कचऱ्यापासून निर्मित खताला मानांकित ओळख

राज्य नोंदणीकृत ‘हरित महासिटी कंपोस्ट’ ब्रॅण्ड  नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन

नवी मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेत ‘कांटे की टक्कर’

दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी ५४ माजी नगरसेवकांचे संख्याबळ नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या

मीरा भाईंदरच्या मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडवणार, मंत्री नितेश राणेंचे आश्वासन

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील उत्तन परिसरातील मच्छीमारांवर होत असलेला अन्याय दूर करून त्यांच्या सर्व समस्या