११९ देशांमधील ५६० कोटी लोकांना चिकनगुनियाचा धोका

२० वर्षांपूर्वी जगभरात केला होता कहर


नवी दिल्ली : सुमारे २० वर्षांपूर्वी जगभरात कहर करणारा हा विषाणू पुन्हा एकदा परतला आहे. या विषाणूचे नाव चिकनगुनिया आहे. गेल्या काही महिन्यांत चिकनगुनिया विषाणूला रियुनियन, मेयोट व मॉरिशस सारख्या बेटांवरून मादागास्कर, सोमालिया आणि केनियासारख्या आफ्रिकन देशांमध्ये पसरला आहे. आता तो चीनमध्ये वेगाने पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) गेल्या महिन्यात इशारा दिला होता की, चिकनगुनिया आशियाई देशांपासून ते युरोपपर्यंत कहर करू शकतो. सध्या आशिया व युरोपमधील अनेक देशांमध्ये त्याचे रुग्ण वाढत आहेत.


डब्ल्यूएचओने म्हटले होते की, सध्या ११९ देशांमधील ५६० कोटी लोकांना चिकनगुनिया संसर्गाचा धोका आहे. दरवर्षी केवळ चीनमध्येच नाही तर भारतातही चिकनगुनियाचे रुग्ण आढळतात. पावसाळ्यात डास वाढतात व चिकनगुनिया विषाणू अधिक पसरू लागतो. २००५ मध्ये चिकनगुनियाने साथीचे रूप धारण केले आणि नंतर हा आजार हिंद महासागरातील लहान बेटांपासून सुरू झाला आणि ५ लाखांहून अधिक लोकांमध्ये पसरला. क्वचित प्रसंगी, चिकनगुनिया अपंगत्व आणू शकतो.


चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात चिकनगुनिया विषाणूचा प्रकोप वाढत असून, जुलैपासून आतापर्यंत सात हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. डासांद्वारे पसरणाऱ्या या विषाणूमुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ माजली आहे.


फोशान शहर सर्वाधिक प्रभावित असून, या ठिकाणी कोविड काळातील उपाययोजनांची आठवण करणारी पावले उचलली जात आहेत. फोशानमध्ये चिकनगुनियाच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्येच ठेवले जात असून, त्यांच्यासाठी खास जाळी लावून डासांपासून संरक्षण केले जात आहे. रुग्णांना ८ दिवसांनंतर किंवा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच डिस्चार्ज दिला जातो. चिकनगुनिया विषाणू संक्रमित डासांच्या चाव्याने पसरणारा आजार आहे.

Comments
Add Comment

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या

Monsoon in Andaman 2026 : आला रे आला...अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?

संपूर्ण देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून अखेर अंदमानच्या  (Andaman)

Fake News Alert! : अफवांवर विश्वास ठेवू नका! राज्यात 'कॅब' सेवा सुरूच राहणार; 'डीजीआयपीआर'ने सांगितले सत्य!

सध्या सोशल मीडियावर ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांसारख्या लोकप्रिय कॅब सेवा महाराष्ट्रात कायमच्या बंद झाल्या