११९ देशांमधील ५६० कोटी लोकांना चिकनगुनियाचा धोका

२० वर्षांपूर्वी जगभरात केला होता कहर


नवी दिल्ली : सुमारे २० वर्षांपूर्वी जगभरात कहर करणारा हा विषाणू पुन्हा एकदा परतला आहे. या विषाणूचे नाव चिकनगुनिया आहे. गेल्या काही महिन्यांत चिकनगुनिया विषाणूला रियुनियन, मेयोट व मॉरिशस सारख्या बेटांवरून मादागास्कर, सोमालिया आणि केनियासारख्या आफ्रिकन देशांमध्ये पसरला आहे. आता तो चीनमध्ये वेगाने पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) गेल्या महिन्यात इशारा दिला होता की, चिकनगुनिया आशियाई देशांपासून ते युरोपपर्यंत कहर करू शकतो. सध्या आशिया व युरोपमधील अनेक देशांमध्ये त्याचे रुग्ण वाढत आहेत.


डब्ल्यूएचओने म्हटले होते की, सध्या ११९ देशांमधील ५६० कोटी लोकांना चिकनगुनिया संसर्गाचा धोका आहे. दरवर्षी केवळ चीनमध्येच नाही तर भारतातही चिकनगुनियाचे रुग्ण आढळतात. पावसाळ्यात डास वाढतात व चिकनगुनिया विषाणू अधिक पसरू लागतो. २००५ मध्ये चिकनगुनियाने साथीचे रूप धारण केले आणि नंतर हा आजार हिंद महासागरातील लहान बेटांपासून सुरू झाला आणि ५ लाखांहून अधिक लोकांमध्ये पसरला. क्वचित प्रसंगी, चिकनगुनिया अपंगत्व आणू शकतो.


चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात चिकनगुनिया विषाणूचा प्रकोप वाढत असून, जुलैपासून आतापर्यंत सात हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. डासांद्वारे पसरणाऱ्या या विषाणूमुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ माजली आहे.


फोशान शहर सर्वाधिक प्रभावित असून, या ठिकाणी कोविड काळातील उपाययोजनांची आठवण करणारी पावले उचलली जात आहेत. फोशानमध्ये चिकनगुनियाच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्येच ठेवले जात असून, त्यांच्यासाठी खास जाळी लावून डासांपासून संरक्षण केले जात आहे. रुग्णांना ८ दिवसांनंतर किंवा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच डिस्चार्ज दिला जातो. चिकनगुनिया विषाणू संक्रमित डासांच्या चाव्याने पसरणारा आजार आहे.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी