११९ देशांमधील ५६० कोटी लोकांना चिकनगुनियाचा धोका

२० वर्षांपूर्वी जगभरात केला होता कहर


नवी दिल्ली : सुमारे २० वर्षांपूर्वी जगभरात कहर करणारा हा विषाणू पुन्हा एकदा परतला आहे. या विषाणूचे नाव चिकनगुनिया आहे. गेल्या काही महिन्यांत चिकनगुनिया विषाणूला रियुनियन, मेयोट व मॉरिशस सारख्या बेटांवरून मादागास्कर, सोमालिया आणि केनियासारख्या आफ्रिकन देशांमध्ये पसरला आहे. आता तो चीनमध्ये वेगाने पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) गेल्या महिन्यात इशारा दिला होता की, चिकनगुनिया आशियाई देशांपासून ते युरोपपर्यंत कहर करू शकतो. सध्या आशिया व युरोपमधील अनेक देशांमध्ये त्याचे रुग्ण वाढत आहेत.


डब्ल्यूएचओने म्हटले होते की, सध्या ११९ देशांमधील ५६० कोटी लोकांना चिकनगुनिया संसर्गाचा धोका आहे. दरवर्षी केवळ चीनमध्येच नाही तर भारतातही चिकनगुनियाचे रुग्ण आढळतात. पावसाळ्यात डास वाढतात व चिकनगुनिया विषाणू अधिक पसरू लागतो. २००५ मध्ये चिकनगुनियाने साथीचे रूप धारण केले आणि नंतर हा आजार हिंद महासागरातील लहान बेटांपासून सुरू झाला आणि ५ लाखांहून अधिक लोकांमध्ये पसरला. क्वचित प्रसंगी, चिकनगुनिया अपंगत्व आणू शकतो.


चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात चिकनगुनिया विषाणूचा प्रकोप वाढत असून, जुलैपासून आतापर्यंत सात हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. डासांद्वारे पसरणाऱ्या या विषाणूमुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ माजली आहे.


फोशान शहर सर्वाधिक प्रभावित असून, या ठिकाणी कोविड काळातील उपाययोजनांची आठवण करणारी पावले उचलली जात आहेत. फोशानमध्ये चिकनगुनियाच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्येच ठेवले जात असून, त्यांच्यासाठी खास जाळी लावून डासांपासून संरक्षण केले जात आहे. रुग्णांना ८ दिवसांनंतर किंवा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच डिस्चार्ज दिला जातो. चिकनगुनिया विषाणू संक्रमित डासांच्या चाव्याने पसरणारा आजार आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर

नवी दिल्ली : आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या

Republic Day 2026 : 'वंदे मातरम्'ची दीडशे वर्षे अन् ७७ वा प्रजासत्ताक दिन; दिल्लीचा 'कर्तव्य पथ' सज्ज, यंदा काय खास ?

नवी दिल्ली : येत्या २६ जानेवारी रोजी संपूर्ण देश आपला ७७ वा प्रजासत्ताक दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यासाठी

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रजासत्ताक दिनाच्या ‘भारत गाथा’ चित्ररथामध्ये संगीताची जादू साकारणार संजय लीला भन्साळी – श्रेया घोषाल

नवी दिल्ली : माहिती व प्रसारण मंत्रालयने भारतीय सिनेमा आणि कथाकथनाच्या परंपरेचा गौरव करत प्रजासत्ताक दिनाच्या

Vaishno Devi Yatra : वैष्णोदेवी यात्रेला निसर्गाचा 'ब्रेक'! मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे यात्रा स्थगित; ३६ तासांचा हाय अलर्ट

कटरा : उत्तर हिंदुस्थानात सध्या कडाक्याची थंडी आणि जोरदार बर्फवृष्टी सुरू असून, याचा मोठा फटका माता

वाहतुकीच्या नियमाचे एका वर्षात पाच वेळा उल्लंघन केल्यास परवाना रद्द होणार; सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: रस्ता सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी, रस्ते

योग, आयुर्वेद अन् ॲलोपॅथीचा संगम

गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते 'हायब्रिड' पतंजली रुग्णालयाचे उद्घाटन  हरिद्वार  : भारताच्या आरोग्य क्षेत्रात