११९ देशांमधील ५६० कोटी लोकांना चिकनगुनियाचा धोका

  27

२० वर्षांपूर्वी जगभरात केला होता कहर


नवी दिल्ली : सुमारे २० वर्षांपूर्वी जगभरात कहर करणारा हा विषाणू पुन्हा एकदा परतला आहे. या विषाणूचे नाव चिकनगुनिया आहे. गेल्या काही महिन्यांत चिकनगुनिया विषाणूला रियुनियन, मेयोट व मॉरिशस सारख्या बेटांवरून मादागास्कर, सोमालिया आणि केनियासारख्या आफ्रिकन देशांमध्ये पसरला आहे. आता तो चीनमध्ये वेगाने पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) गेल्या महिन्यात इशारा दिला होता की, चिकनगुनिया आशियाई देशांपासून ते युरोपपर्यंत कहर करू शकतो. सध्या आशिया व युरोपमधील अनेक देशांमध्ये त्याचे रुग्ण वाढत आहेत.


डब्ल्यूएचओने म्हटले होते की, सध्या ११९ देशांमधील ५६० कोटी लोकांना चिकनगुनिया संसर्गाचा धोका आहे. दरवर्षी केवळ चीनमध्येच नाही तर भारतातही चिकनगुनियाचे रुग्ण आढळतात. पावसाळ्यात डास वाढतात व चिकनगुनिया विषाणू अधिक पसरू लागतो. २००५ मध्ये चिकनगुनियाने साथीचे रूप धारण केले आणि नंतर हा आजार हिंद महासागरातील लहान बेटांपासून सुरू झाला आणि ५ लाखांहून अधिक लोकांमध्ये पसरला. क्वचित प्रसंगी, चिकनगुनिया अपंगत्व आणू शकतो.


चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात चिकनगुनिया विषाणूचा प्रकोप वाढत असून, जुलैपासून आतापर्यंत सात हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. डासांद्वारे पसरणाऱ्या या विषाणूमुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ माजली आहे.


फोशान शहर सर्वाधिक प्रभावित असून, या ठिकाणी कोविड काळातील उपाययोजनांची आठवण करणारी पावले उचलली जात आहेत. फोशानमध्ये चिकनगुनियाच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्येच ठेवले जात असून, त्यांच्यासाठी खास जाळी लावून डासांपासून संरक्षण केले जात आहे. रुग्णांना ८ दिवसांनंतर किंवा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच डिस्चार्ज दिला जातो. चिकनगुनिया विषाणू संक्रमित डासांच्या चाव्याने पसरणारा आजार आहे.

Comments
Add Comment

निवडणूक आयोगाकडून उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी वेळापत्रक घोषित

आवश्यकता भासल्यास ९ सप्टेंबर रोजी मतदान नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट नवी दिल्ली :

डोनाल्ड ट्रम्प यांना मोदी वठणीवर आणणार! चीन दौऱ्याआधी दिल्लीत पुतिन-मोदी भेट होणार?

मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा भारत दौरा यावर्षी होणार असून, त्या दौऱ्याच्या तारखा सध्या अंतिम

पोस्टात मोठा बदल! १ सप्टेंबरपासून पोस्टाची 'ही' सेवा बंद होणार, नवीन नियमांचे फायदे-तोटे काय?

मुंबई : तुम्ही कधी विचार केलाय का, एका पत्रात किती भावना दडलेल्या असतात? एका क्षणाचा निरोप, आनंदाचे क्षण आणि

अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर संतापले शशी थरुर, मोदींना सुचवला रामबाण उपाय

नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत प्रतिक्रिया

Gurugram Crime : रस्त्यावर तरुणाचं हस्तमैथून! "कॅबची वाट पाहत असताना मॉडेलवर 'तो' घुटमळत होता… पुढे काय घडलं, वाचून हादराल!"

गुरुग्राम : गुरुग्राममधील राजीव चौक परिसरात अत्यंत वर्दळीच्या एक लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे. एका मॉडेल

Devendra Fadanvis : "ओबीसीसाठी लढलो म्हणून टार्गेट झालो, पण लढा थांबणार नाही!" देवेंद्र फडणवीसांचा ठाम निर्धार

गोवा : गोव्यात सुरू असलेल्या ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी