भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने


नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत राखण्यात यश मिळवले. आता टीम इंडिया ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २-२ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.


भारत उर्वरित वर्षातील सर्व कसोटी मालिका मायदेशात खेळणार आहे. भारत आता ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कसोटी मालिका खेळणार आहे. भारत ऑक्टोबर महिन्यात विंडीजविरुद्ध २ ते १४ ऑक्टोबरदरम्यान २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर शुभमनसेना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोव्हेंबरमध्ये २ मॅचची टेस्ट सीरिज खेळणार आहे. विंडीज विरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना २ ते ६ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे तर दुसरा सामना १० ते १४ ऑक्टोबरदरम्यान दिल्ली येथे होणार आहे.


तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना १४ ते १८ नोव्हेंबरला कोलकाता आणि दुसरा सामना २२ ते २६ नोव्हेंबरला गुवाहाटी येथे पार पडणार आहे.


दरम्यान, शुभमन गिल याच्या नेतृत्वातील पहिली कसोटी मालिका भारताने बरोबरीत सोडवली. भारताने इंग्लंड दौऱ्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत राखली.


टीम इंडिया पाचव्या सामन्याआधी या मालिकेत १-२ ने पिछाडीवर होती. त्यामुळे भारतासाठी पाचवा सामना हा प्रतिष्ठेचा होता. भारतासमोर हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचं आव्हान होते. टीम इंडियाने हा सामना जवळपास गमावलाच होता. मात्र टीम इंडियाने ऐन क्षणी सामन्यात कमबॅक केलं आणि इंग्लंडवर अवघ्या ६ धावांनी सनसनाटी विजय मिळवला.

Comments
Add Comment

Indian Railway Rules: रेल्वे तिकीट आठ दिवसांपूर्वी रद्द केल्यावर रिफंड...; रेल्वेच्या नियमांत महत्त्वाचा बदल

नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी रेल्वे तिकीट प्रणाली आणि प्रवाशांच्या

Sonia Gandhi: सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक मंगळवारी रात्री

Supreme Court : अन्य धर्म स्वीकारल्यास एससी-एसटी दर्जा होणार रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एससी-एसटी अधिनियमासंदर्भात आज, मंगळवार २४ मार्च रोजी मोठा निर्णय दिला आहे.

PM Narendra Modi : ‘होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळा अस्वीकार्य’; लोकसभेत पंतप्रधान मोदींचा जगाला स्पष्ट संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणाव आणि युद्धस्थितीवर लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करताना

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचा पश्चिम आशियासाठी ३० विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, अनेक विमान कंपन्यांना पश्चिम आशियाई देशांमधील

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची काश्मिरात छापेमारी

श्रीनगर : दिल्लीतील लाल किला स्फोट प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआयए) ने आज, सोमवारी पहाटे काश्मीर