वसईत डॉक्टरच्या ऑटोमॅटीक ईव्ही कारचा थरकाप उडवणारा अपघात

  79

वसई : वसई येथील सन सिटी परिसरात एका डॉक्टरचा आणि त्याच्या पत्नीचा भयानक अपघात झाला. मिथिलेश मिश्रा असं या डॉक्टरचे नाव असून त्यांच्याकडे MG ZS EV टॉप मॉडेल कार आहे. डॉ. मिश्रा यांच्यासोबत झालेल्या प्रकारामुळे संपूर्णपण ऑटोमॅटीक असलेल्या ईव्ही एमजी कारच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


डॉक्टर मिथिलेश मिश्रा आणि त्यांची पत्नी त्यांच्या पूर्णपणे ऑटोमॅटिक MG Zm कारमधून बाहेर जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्या गाडीची सिस्टम अचानक फेल झाल्यामुळे ही दुर्घटना घडली असा आरोप करण्यात येत आहे.हा प्रकार सोसायटीच्या पार्किंगमध्ये घडला. डॉक्टर मिश्रा आपल्या बायकोसोबत बाहेर जेवायला निघाले होते. डॉ.मिश्रा हे गाडीत आपल्या पत्नीची वाट पाहत होते. त्यांची गाडी न्यूट्रलवर होती आणि हँडब्रेकही लावलेला होता. पत्नी गाडीत बसल्यानंतर गाडी ड्रायव्हिंग मोडवर टाकण्यासाठी ब्रेक रिलीज होत नव्हता. मिश्रा यांनी बराचवेळ ब्रेक काढण्यासाठी प्रयत्न केला.सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली असून काही सेकंद ही गाडी जागीच उभी असल्याचे दिसून आले आहे. मिश्रा यांनी सांगितले की गाडीचा ब्रेक आपोआप निघाला आणि गाडीने प्रचंड वेग घेतला. गाडी थेट इमारतीच्या भिंतीवर आदळली आणि जागीच उलटली.



ही कार भिंतीला धडकत असताना गाडीच्या समोरून एक तरुण जात होता. मिश्रा यांची अनियंत्रित झालेली कार या तरुणाला चिरडू शकली असती. मिश्रा यांनी सांगितले की स्टेअरींग डावीकडे वळवल्याने त्या तरुणाचा जीव वाचला. मात्र कार भिंतीला धडकून उलटली आणि मिश्रा दाम्पत्य आतच अडकले होते. गाडी इतक्या वेगाने धडकल्यानंतरही एकही एअरबॅग उघडली नाही आणि दरवाजेही उघडले नाहीत, ज्यामुळे डॉक्टर दांपत्य गाडीत काही काळ अडकले. स्थानिक रहिवाशांनी गाडीचे सनरूफ तोडून त्यांना बाहेर काढले. या अपघातात कोणीही जबर जखमी झाले नाही.

Comments
Add Comment

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ९ महत्वाचे निर्णय !

विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांची कार्यपद्धती प्रभावीरित्या

वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत

न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ, जरांगे मुंबईत येणार की नाही येणार लवकरच ठरणार

मुंबई : फडणवीस सरकारच्या निर्देशानुसार मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात झाली. उपसमितीचे

'अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे'

मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील

'दिवेआगरच्या सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकर सुरू करा'

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील प्रस्तावित १४ कोटी रु.ची तरतुद असलेल्या सुपारी संशोधन केंद्राचे काम