'टॅरिफ 'मुळे कोकणचा आमरस संकटात

मुंबई (प्रतिनिधी) :अमेरिकेने भारतावर २५ टक्के टैरिफ लादल्यामुळे त्याचा फटका कोकणातील हापूस आमरस (मैंगो पल्प) निर्यातीला बसणार आहे. या नव्या धोरणामुळे भारतातून अमेरिकेला होणारी आमरसाची निर्यात घटण्याची भीती निर्यातदारांनी व्यक्त केली आहे.


भारतातून दरवर्षी १५ हजार मेट्रिक टन आमरसाची निर्यात होते. त्यापैकी २०० कोटी रुपयांचा आमरस अमेरिकेत जातो. या निर्यातीमध्ये कोकणातील हापूस आमरसचा मोठा वाटा आहे. कोकणातून दरवर्षी ५० कोटी रुपयांचा आमरस अमेरिकेत निर्यात होत असतो. अमेरिकेच्या या टेरिफमुळे ५० कोटींच्या निर्यातीवर १२.५० कोटी रुपयांचा अतिरिक्त कर लागणार आहे.


अमेरिकेतली ग्राहकांनाही आमरससाठी २५ टक्के जास्त किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे आमरसच्या मागणीत घट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या नवीन नियमावलीमुळे आंबा प्रक्रिया व्यावसायिकांना झळ बसण्याची शक्यता आहे.


अमेरिकेने भारतावर २५ टक्के टैरिफ लावला आहे. त्यामुळे कोकणातून निर्यात होणाऱ्या आगरसावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कोकणातून ५० कोटींचा आमरस निर्यात होतो. या ५० कोटीच्या निर्यातीवर लागणाऱ्या अतिरिक्त कराची झळ प्रक्रिया व्यावसायिकांना बसणार आहे. अमेरिकेतील आमरस घेणाऱ्या ग्राहकांनाही जास्त किंमत मोजावी लागणार आहे. परिणामी, विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यामध्ये लक्ष देत पूर्वीप्रमाणे शून्य टक्के टॅरिफ कर करावा, यासाठी प्रयत्न करावेत. आनंद देसाई, आंवा प्रक्रिया उद्योजक व निर्यातदार, रत्नागिरी

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात