कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर हे आधी वाचा...

  18

ऑफलाइन पास देणाऱ्या खिडक्या स्वातंत्र्यदिनापासून बंद


मंत्रालय प्रवेशासाठी सर्वसामान्यांना आता ' डीजी' नोंदणी बंधनकारक


मुंबई (प्रतिनिधी) : कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर 'डीजी अ‍ॅप'वर नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. 'डीजी अ‍ॅप'वर नोंदणी असणाऱ्या अभ्यागतांनाच आता मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे.


कामानिमित्त राज्यभरातील लोक मंत्रालयात धाव घेतात. मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी अभ्यागतांसह वकील, राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना गार्डन गेटजवळील खिडकीवर ऑफलाइन पास काढणे बंधनकारक आहे. मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी गार्डन गेट जवळ ऑफलाइन पाससाठी ९ खिडक्या, तर नवीन प्रशासकीय इमारतीत १ खिडकी अशा एकूण १० खिडक्यांवर ऑफलाइन पास उपलब्ध होतो. मात्र मंत्रालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने १५ ऑगस्टपासून खिडक्यांवर ऑफलाइन पास देणे बंद करण्यात येणार आहे.


मंत्रालयात येणाऱ्या व्हीव्हीआयपीची सुरक्षा व गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्च २०२५ मध्ये फेस डिटेक्शन व 'डीजी अ‍ॅप' प्रणाली अमलात आणली आहे. त्यामुळे आता ऑफलाइन पास पद्धत बंद करण्यात येणार असून अभ्यागतांना आता 'डीजी अ‍ॅप' वरच मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे, असे गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी सांगितले.


कामानिमित्त मंत्रालयात येणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने फेस डिटेक्शन व डीजी प्रवेश अ‍ॅप प्रणाली अमलात आणली. या दोन्ही प्रणालीमुळे मंत्रालयातील गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार असल्याचे निकम यांनी सांगितले.



असा डाऊनलोड करा 'डीजी अ‍ॅप'


डीजी प्रवेश अ‍ॅप हे मोबाइल अ‍ॅप अण्ड्राईड आणि आयओएस अ‍ॅप या दोन्ही प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपल्या मोबाइलच्या प्रणालीनुसार अँड्राईडमध्ये प्ले स्टोअरवर, तर आयओएस अ‍ॅपल स्टोअरवर डीजी प्रवेश (digi pravesh) हे सर्च केल्यास हे अ‍ॅप विनामूल्य डाऊनलोड करता येते. या अ‍ॅपवर सुरुवातीला केवळ एकदाच नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांकावर आधारित यंत्रणेद्वारे छायाचित्राची ओळख पटवून नोंदणी पूर्ण केल्यानंतर ज्या विभागात काम आहे, त्याचा स्लॉट बुक करून रांगेशिवाय प्रवेश मिळतो.

Comments
Add Comment

Devendra Fadanvis : फडणवीसांचा निशिकांत दुबेनां थेट सल्ला, “आम्ही सक्षम आहोत, वक्तव्यांपूर्वी विचार करा!”

मुंबई : मराठी विरुद्ध हिंदी या वादावर पुन्हा एकदा पेटलेलं राजकारण आता चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. भाजपचे

'टॅरिफ 'मुळे कोकणचा आमरस संकटात

मुंबई (प्रतिनिधी) :अमेरिकेने भारतावर २५ टक्के टैरिफ लादल्यामुळे त्याचा फटका कोकणातील हापूस आमरस (मैंगो पल्प)

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम