शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले शिक्षक आशिष भाऊसाहेब शिंदे यांचा मृतदेह अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव परिसरातील स्वराज्य फॅमिली रेस्टॉरंट अ‍ॅण्ड लॉजमधील खोलीत आढळून आला.


हॉटेल कर्मचाऱ्यांनी रूम सर्व्हिससाठी दरवाजा अनेक वेळा ठोठावला, परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने व्यवस्थापकांनी संशय व्यक्त करत दरवाजा उघडण्याचा निर्णय घेतला. दरवाजा उघडताच खोलीत आशिष शिंदे हे पंख्याला दोरीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळले.



घटनेची माहिती मिळताच अर्धापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.


या प्रकरणात अर्धापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूमागील नेमकं कारण काय, याचा तपास सुरू आहे. शिक्षकांच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात