शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले शिक्षक आशिष भाऊसाहेब शिंदे यांचा मृतदेह अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव परिसरातील स्वराज्य फॅमिली रेस्टॉरंट अ‍ॅण्ड लॉजमधील खोलीत आढळून आला.


हॉटेल कर्मचाऱ्यांनी रूम सर्व्हिससाठी दरवाजा अनेक वेळा ठोठावला, परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने व्यवस्थापकांनी संशय व्यक्त करत दरवाजा उघडण्याचा निर्णय घेतला. दरवाजा उघडताच खोलीत आशिष शिंदे हे पंख्याला दोरीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळले.



घटनेची माहिती मिळताच अर्धापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.


या प्रकरणात अर्धापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूमागील नेमकं कारण काय, याचा तपास सुरू आहे. शिक्षकांच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

अशोक खरात कारनाम्याचा भांडाफोड, १८ मार्च रोजी कसा झाला आरोपी?, जाणून घ्या

नाशिक: बड्या बेड्या नेत्यांचा 'गुरु' असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्याचा भांडाफोड सुरू झाला आहे. जवळपास ५८

सोसाट्याचा वाऱ्यासह गाराचा पाऊस पडणार, हवामान विभागाकडून पाच जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका सोसणाऱ्या महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने महत्त्वाची अपडेट दिली

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ