शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

  25

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले शिक्षक आशिष भाऊसाहेब शिंदे यांचा मृतदेह अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव परिसरातील स्वराज्य फॅमिली रेस्टॉरंट अ‍ॅण्ड लॉजमधील खोलीत आढळून आला.


हॉटेल कर्मचाऱ्यांनी रूम सर्व्हिससाठी दरवाजा अनेक वेळा ठोठावला, परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने व्यवस्थापकांनी संशय व्यक्त करत दरवाजा उघडण्याचा निर्णय घेतला. दरवाजा उघडताच खोलीत आशिष शिंदे हे पंख्याला दोरीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळले.



घटनेची माहिती मिळताच अर्धापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.


या प्रकरणात अर्धापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूमागील नेमकं कारण काय, याचा तपास सुरू आहे. शिक्षकांच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Sambhajinagar Illegal Construction: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा; विरोध करणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई

विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच