शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश


मुंबई (प्रतिनिधी) : सन २०२५ वर्ष हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली यांच्या ७५०व्या जयंतीचे वर्ष आहे. यानिमित्ताने संत ज्ञानेश्वर माउलींचा पसायदानाच्या माध्यमातून दिलेला विचार राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये एकाच वेळी पोहोचावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार येत्या १४ ऑगस्ट रोजी राज्यातील प्रत्येक शाळेत पसायदानाचे पठण करण्यात यावे, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळांना दिले आहेत. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी पुणे येथील शिक्षण विभागाचे आयुक्त यांना यासंदर्भात फळविले आहे.


शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून हे आदेश राज्यातील सर्व अनुदानित, विना अनुदानित, खासगी, महापालिका, जिल्हा परिषद,संस्थात्मक शाळांना कळविण्यात आले आहेत. १५ ऑगस्ट रोजी गोकुळ अष्टमीला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माठली यांची ७५० वी जयंती आहे. या दिवशी १५ ऑगस्टनिमित्त झेंडावंदन, प्रभातफेरीचे कार्यक्रम शाळांमध्ये असल्याने पसायदान पठणाचा कार्यक्रम १४ ऑगस्ट रोजी करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आदेश आहेत. हे आदेश प्राप्त होताच राज्यातील १५ शाळांनी ऑगस्टच्या झेंडावंदनाच्या तयारी बरोबर पसायदान सामूहिक पठणाची जोरदार तयारी शाळांमध्ये सुरू केली आहे. काही यासंदभांत आम्हाला अद्याप आदेश प्राप्त नाहीत. पण आदेश प्राप्त होताच शालेय शिक्षण विभागाच्या आदेशाचे पालन केले जाईल असे सांगितले.


तर, बहुतांशी शाळा संस्था संस्थापकांनी आम्ही आमच्या शाळेत नियमित पसायदान, मनाचे श्लोक, संस्कृतीशी निगडित मुलांवर संस्कार करणाऱ्या प्रार्थना, राष्ट्रभक्तीपर गीतांचे सामुदायिक पठण करत असतो असे सांगितले, १४ ऑगस्ट रोजी शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार आम्ही हा कार्यक्रम पार पाडू असे सांगितले. पसायदानातून संत ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वाचा विचार मांडला आहे.


हा विचार शालेय जीवनापासून विद्याथ्यांना कळाया हाही या उपक्रमा मागील उद्देश असल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ जुलै रोजी राज्यातील शाळांमध्ये पसायदानाचे पठण करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशाप्रमाणे शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी ३१ जुलै रोजी शालेय शिक्षण आयुक्तांना पत्र लिहून मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.


मागील दोन महिन्यांपासून राज्यांमधील शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीच्या विषपावरून जोरदार राजकीय घमासान सुरू होते. या हिंदी सक्तीच्या विषयावरून उलटसुलट आरोप प्रत्यारोप झाल्यामुळे राज्य सरकारला हिंदी सक्तीचा विषय रद्द करावा लागला होता. यावरून विरोधकांनी जल्लोष केला होता.

Comments
Add Comment

Rajnath Singh : पाकिस्तानविरुद्ध दीर्घ लढ्यास भारत तयार – राजनाथ सिंह

नवी दिल्ली : भारताने ऑपरेशन सिंदूर हे आपल्या अटींवर स्वेच्छेने थांबवले होते आणि गरज पडल्यास पाकिस्तान विरुद्ध

Women's T20 World Cup : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; अशी केली जाणार निवड

मुंबई : २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १२ जून ते ५ जुलै

Summer Special Trains : प्रवाशांच्या मागणीमुळे LTT वरून खास, मुंबई – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

मुंबई : प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी

Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या संपर्क केंद्रात भारतीय सांकेतिक भाषा सहाय्य सेवेची सुरुवात

मुंबई : भारताची आंतरराष्ट्रीय बँक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ बडोदाने (बँक) आपल्या संपर्क केंद्रात व्हिडीओ

Kalyan and Badlapur Power Blocks : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवर उद्या आणि परवा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स

मुंबई : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवरील ओएचई (OHE) कामासाठी अप व डाउन दक्षिण-पूर्व मार्गावर दिनांक

Missing link : मिसिंग लिंकची गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद; जगातला सर्वात रुंद बोगदा म्हणून रेकॉर्ड केला नावावर

मुंबई : भारतीय इंजिनिअरींगचा अदभूत चमत्कार असलेला आणि मुंबई पुणे अंतर कमी करणारा सर्वात महत्वाच्या पुलाची आता