हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता


अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील हुंडा व एकूणच लग्नसमारंभातील वाढता दिखावा आणि लग्नातील अनाठायी खर्चावर समाजातील लोकांकडूनच बोट ठेवले गेले. अहिल्यानगरमधील मराठा समाजाने अत्यंत पुरोगामी पाऊल उचलत समाजातून हुंडा हद्दपार करण्याचा विडा उचलला. तसेच लग्नातल्या बडेजावाला काट मारणारी एक आचारसंहिताच जाहीर केली आहे.


या आचारसंहितेच्या प्रसार व प्रचारासाठी लग्न सोहळे साधे सुसंस्कारित आणि हुंडामुक्त व्हावेत यासाठी अहिल्यानगर येथे मराठा लग्न आचारसंहिता संमेलन २०२५ भरवण्यात आले.


हुंड्याऐवजी मुलीच्या नावाने मुदत ठेव, प्री-वेडिंगचा व्हिडिओ जर लग्नात स्क्रीनवर दाखवला तर उठून जावे, डीजेऐवजी पारंपरिक वाद्य वापरावीत, लग्न सोहळा १०० ते २०० लोकांमध्ये करावा अशा अनेक मुद्दे या संमेलनात मांडण्यात आले. या संमेलनाला ह.भ.प. भास्करगिरी महाराज, ह.भ.प. जंगले महाराज शास्त्री, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे यांच्यासह मराठा समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

ST Bus : उत्पन्नाच्या तुलनेत 'एसटी'ला दररोज २ कोटींचा तोटा

- महसूल वाढीसाठी इंधन विक्री क्षेत्रात उतरणार; परिवहन मंत्री सरनाईक यांनी आखली विशेष योजना मुंबई : राज्याची

अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मुंबई :

डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत

पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, ओव्हरटेकच्या नादात...

पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर पाटसजवळ एका भीषण अपघाताने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सोलापूरहून

अशोक खरातचे ५८ व्हिडीओ कसे समोर आले?, प्रकरणात नवा ट्विस्ट

नाशिक: राजकारण्यांना स्वप्न दाखवणाऱ्या तथाकथित ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर

गडचिरोली : ११ जहाल माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

- गडचिरोली पोलीस सीआरपीएफ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश एकेकाळी माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या