आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने जोडप्यावर हल्ला : आई आणि भावाने केले मुलीचे अपहरण

  54

पुणे : खेड तालुक्यातील खरपुडी गावात आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यावर हल्ला करत पत्नीचे अपहरण करण्यात आले आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


आंतरजातीय विवाहाला ग्रामीण भागात अजूनही मोठ्या प्रमाणात विरोध केला जातो . याचेच एक उदाहरण खेड तालुक्यातील खरपुडी गावात पाहायला मिळालं आहे . मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ गोसावी आणि त्याची पत्नी प्राजक्ता गोसावी यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन आंतरजातीय प्रेमविवाह केला . लग्नानंतर दोघेही खरपुडी (ता. खेड ) येथे राहत होते. मात्र त्यांच्या लग्नाला काही नातेवाईकांचा विरोध होता. याच रागातून रविवारी सायंकाळी प्राजक्ताच्या आई आणि भावांनी जमावासह गावात येऊन विश्वनाथला जबर मारहाण केली आणि प्राजक्ताचे अपहरण करून तिला घेऊन गेले .


या प्रकरणी प्राजक्ताचा भाऊ, आई आणि इतर मिळून एकूण १५ जणांवर खेड पोलीस स्टेशनमध्ये अपहरण आणि गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे . पोलिसांनी प्राजक्ता सुखरुप असून लवकरचं तिची सूटका केली जाईल, असा दावा केलाय.


मात्र 'माझ्या पत्नीचा जीव धोक्यात असून, तिचं काही बरं वाईट केलं जाईल'. अशी भीती जखमी पती विश्वनाथ गोसावीने व्यक्त केलीये. गेल्या वर्षभरात प्राजक्ताच्या कुटुंबीयांकडून आम्हाला वारंवार धमकी देण्यात येत होती . आम्ही उच्च कुटुंबातील आहोत , तुम्हाला जिवंत ठेवणार नाही आम्ही तुम्हाला ठार मारू, अशाप्रकारे धमकी ते देत होते . याप्रकरणी खेड पोलीस स्टेशनला तक्रार केली होती . वारंवार खेड पोलिसांना याबाबत कळवलं होतं, त्यांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र ठोस काही झालं नाही, अखेर माझ्या पत्नीचं अपहरण झालं. अशी आपबिती विश्वनाथने मांडली आहे.


ही घटना केवळ एका प्रेमविवाहाचा प्रश्न नसून, समाजातील जातीय तेढ आणि जुनाट मानसिकतेचे दर्शन घडवणारी आहे. प्राजक्ताला जबरदस्तीने पळवून नेल्याची बाब तिच्या इच्छेविरुद्ध असल्याचे संकेत मिळत असून यामुळे कायद्यानेदेखील हा गंभीर गुन्हा ठरतो. प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी खरपुडी गावात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामस्थांनाही शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे - आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

"बाळाच्या रंगावरून बोलाल तर खबरदार..." टीव्ही अभिनेत्रीने ट्रोलर्सना खडसावले, केली थेट कायदेशीर कारवाई

हिंदी टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीच्या ७ महिन्यांच्या बाळाला सावळ्या रंगामुळे ट्रोल करण्यात

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

समृद्धीवर वेगमर्यादेचे उल्लंघन, आता असणार सीसीटीव्हीची नजर

अमरावती : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण