आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने जोडप्यावर हल्ला : आई आणि भावाने केले मुलीचे अपहरण

पुणे : खेड तालुक्यातील खरपुडी गावात आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यावर हल्ला करत पत्नीचे अपहरण करण्यात आले आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


आंतरजातीय विवाहाला ग्रामीण भागात अजूनही मोठ्या प्रमाणात विरोध केला जातो . याचेच एक उदाहरण खेड तालुक्यातील खरपुडी गावात पाहायला मिळालं आहे . मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ गोसावी आणि त्याची पत्नी प्राजक्ता गोसावी यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन आंतरजातीय प्रेमविवाह केला . लग्नानंतर दोघेही खरपुडी (ता. खेड ) येथे राहत होते. मात्र त्यांच्या लग्नाला काही नातेवाईकांचा विरोध होता. याच रागातून रविवारी सायंकाळी प्राजक्ताच्या आई आणि भावांनी जमावासह गावात येऊन विश्वनाथला जबर मारहाण केली आणि प्राजक्ताचे अपहरण करून तिला घेऊन गेले .


या प्रकरणी प्राजक्ताचा भाऊ, आई आणि इतर मिळून एकूण १५ जणांवर खेड पोलीस स्टेशनमध्ये अपहरण आणि गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे . पोलिसांनी प्राजक्ता सुखरुप असून लवकरचं तिची सूटका केली जाईल, असा दावा केलाय.


मात्र 'माझ्या पत्नीचा जीव धोक्यात असून, तिचं काही बरं वाईट केलं जाईल'. अशी भीती जखमी पती विश्वनाथ गोसावीने व्यक्त केलीये. गेल्या वर्षभरात प्राजक्ताच्या कुटुंबीयांकडून आम्हाला वारंवार धमकी देण्यात येत होती . आम्ही उच्च कुटुंबातील आहोत , तुम्हाला जिवंत ठेवणार नाही आम्ही तुम्हाला ठार मारू, अशाप्रकारे धमकी ते देत होते . याप्रकरणी खेड पोलीस स्टेशनला तक्रार केली होती . वारंवार खेड पोलिसांना याबाबत कळवलं होतं, त्यांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र ठोस काही झालं नाही, अखेर माझ्या पत्नीचं अपहरण झालं. अशी आपबिती विश्वनाथने मांडली आहे.


ही घटना केवळ एका प्रेमविवाहाचा प्रश्न नसून, समाजातील जातीय तेढ आणि जुनाट मानसिकतेचे दर्शन घडवणारी आहे. प्राजक्ताला जबरदस्तीने पळवून नेल्याची बाब तिच्या इच्छेविरुद्ध असल्याचे संकेत मिळत असून यामुळे कायद्यानेदेखील हा गंभीर गुन्हा ठरतो. प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी खरपुडी गावात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामस्थांनाही शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

या ५ तेलांचा उपयोग ठरेल केसांसाठी वरदान !

केसांची काळजी घेणे हे अनेकांसाठी खूप महत्वाचे असते. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी ट्राय करण्याची इच्छा असते, पण

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र