मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, महिलेचा मृत्यू

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर एका मोपेडला ईर्टीका कारने जोरदार धडक दिल्यामुळे मूळ देवगड फणसगाव आणि सध्या रा. ओरोस वर्दे रोड येथील मोपेडवर मागे बसलेल्या सौ शमिका शशांक पवार वय २७ या जागीच ठार झाल्या. तर मोपेड चालक शशांक प्रकाश पवार वय ४० त्यांचे चार महिन्याचे बाळ कु. पवित्रा व साडेतीन वर्षाच्या प्रभास हा सुदैवाने बचावला. हा अपघात सोमवारी साडेबाराच्या दरम्यान झाला. घटनास्थळी तात्काळ ओरोस पोलीस, महामार्ग पोलीस व कसालचे सरपंच राजन परब पोहचले. जखमीना तात्काळ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.


गोव्याकडून आलेली एट्रिगा कार (एमपी ०९ झेडव्हाय ६९७५) मुंबईच्या दिशेने जात असताना कणकवलीच्या दिशेने जाणारे शशांक पवार यांनी महामार्गावर विरोधी दिशेकडील दुसऱ्या लेन कडे जाण्याचा आकस्मिक प्रयत्न केला. त्यामुळे या कारची धडक पवार यांच्या (एमएच ०७ एव्ही १२२९) या अपंगांच्या चार चाकी सुझुकी एक्सेस मोपेडला बसली. मोपेड च्या मागे असलेल्या शशांक पवार यांच्या पत्नी शमिका पवार या धडकेत रस्त्यावर जोरदार आपटल्या. त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्या जागीच गतप्राण झाल्या. तर मोपेड स्वार शशांक पवार व मयत झालेल्या शमिका पवार यांच्या हातात असलेली चार महिन्यांची पवित्रा व मध्ये बसलेला साडेतीन वर्षाचा त्यांचा मुलगा प्रभास हा सुदैवाने बचावला.


याप्रकरणी ईरटीका गाडीचा चालक राहुल शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. अपघात वृत्त समजतात घटनास्थळी मार्ग महामार्ग पोलिसांचे पथक तातडीने दाखल झाले. ए एस आय प्रकाश गवस, नंदू गोसावी, रवी इंगळे, सागर परब ओरोस पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भुतेलो, गोसावी दाखल झाले. अपघात स्थळी नागरिकांनी ही मदत कार्य केले.

Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे