मंत्री नितेश राणे उद्या घेणार अश्विनी वैष्णव यांची भेट

कोकण रेल्वे प्रवासी समितीच्या भेटीत समस्यांवर सविस्तर चर्चा 


कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या विविध समस्यांसंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सोमवारी भेट घेणार असून, या बैठकीत तिकीट सुविधा, जलदगाड्यांचे थांबे, नवीन गाड्या सुरू करण्यासाठी आणि गणपती स्पेशल गाड्यांचे थांबे याची मागणी केली जाणार आहे. या संदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.


ओम गणेश निवास, कणकवली येथे कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती, सिंधुदुर्गच्या शिष्टमंडळाने नितेश राणे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी राणे म्हणाले, ‘आपल्या मागण्यांवर रेल्वे मंत्र्यांसमवेत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. यापुढे दर तीन महिन्यांनी मी व प्रवासी संघटना मिळून संयुक्त बैठक घेऊन समस्यांचे निराकरण करू’, असे सांगितले.


गणपती सणासाठी विशेष गाड्या


२५ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत मडूरे-दादर व सावंतवाडी-सीएसटीएम या दोन नव्या गाड्या तत्काळ सुरू कराव्यात. पुढे प्रवाशांचा प्रतिसाद पाहून त्या कायमस्वरूपी सुरू ठेवाव्यात. मडूरे-रत्नागिरी दरम्यान लोकल पॅसेंजर गाडी (सावंतवाडी-मंडगाव धर्तीवर) तत्काळ सुरू करावी. रेल्वे स्थानकांवरील सुविधा संदर्भात सिंधुदुर्ग, वैभववाडी आणि नांदगाव रेल्वे स्थानकांवर पीआरएस सेवा तातडीने सुरू करावी.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व १० रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना आवश्यक त्या सेवा-सुविधा मिळाव्यात. सध्या कोकण मार्गावर धावणाऱ्या ७५ पैकी १६ जलदगाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबत नाहीत. या गाड्यांना थांबे देण्यात यावेत, यासाठी मागणी करण्यात आली आहे. सावंतवाडी स्टेशनला ‘सावंतवाडी टर्मिनल’ असे नाव देण्यात यावे आणि त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करावा. कसाल रेल्वे स्थानक सुरू करणे, अशा अनेक मागण्या यावेळी शिष्टमंडळाने केल्या.

Comments
Add Comment

FIFA WORLDCUP 2026 : परदेशी पर्यटकांच्या नजरेतून 'अस्सल' अमेरिका; वृत्तमाध्यमांच्या प्रतिमेपलीकडचा अनुभव!

फिफा विश्वचषक २०२६ साठी जगभरातून आलेले पर्यटक केवळ फुटबॉलचा आनंद घेण्यासाठीच आले नाहीत, तर त्यांनी

Pune Sucide News : पुणे हादरलं ! १७ वर्षीय मुलीने  उचलले टोकाचे पाऊल थेट पाचव्या मजल्यावरुन....

पुणे : राज्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशातच पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली

NCP : राष्ट्रवादीत प्रफुल्ल पटेल नाराज नाहीत!- हसन मुश्रीफ

विलिनिकरण करायचे असल्यास चर्चा दिल्लीतच होतील मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या आणि

Ashok Kharat : अशोक खरातचा पाय खोलात ! ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र; रिमोटचा साप अन् ...

Ashok Kharat: नाशिक काय तर संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत नव्याने वाढ झाली आहे. धर्माच्या

Dattatray Bharne : बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांची तक्रार आल्यास अधिकारी येणार बांधावर

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे; तक्रारींचे सात दिवसांत निराकरण बंधनकारक मुंबई : शेतकऱ्यांकडून बोगस बियाणे किंवा

Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग, म्युरल्स उभारण्याच्या डॉ. प्रवीण गेडाम यांच्या सूचना

Nashik Simhastha Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व परिसरातील विविध नदीघाटांवर सुरू असलेल्या