मंत्री नितेश राणे उद्या घेणार अश्विनी वैष्णव यांची भेट

कोकण रेल्वे प्रवासी समितीच्या भेटीत समस्यांवर सविस्तर चर्चा 


कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या विविध समस्यांसंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सोमवारी भेट घेणार असून, या बैठकीत तिकीट सुविधा, जलदगाड्यांचे थांबे, नवीन गाड्या सुरू करण्यासाठी आणि गणपती स्पेशल गाड्यांचे थांबे याची मागणी केली जाणार आहे. या संदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.


ओम गणेश निवास, कणकवली येथे कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती, सिंधुदुर्गच्या शिष्टमंडळाने नितेश राणे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी राणे म्हणाले, ‘आपल्या मागण्यांवर रेल्वे मंत्र्यांसमवेत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. यापुढे दर तीन महिन्यांनी मी व प्रवासी संघटना मिळून संयुक्त बैठक घेऊन समस्यांचे निराकरण करू’, असे सांगितले.


गणपती सणासाठी विशेष गाड्या


२५ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत मडूरे-दादर व सावंतवाडी-सीएसटीएम या दोन नव्या गाड्या तत्काळ सुरू कराव्यात. पुढे प्रवाशांचा प्रतिसाद पाहून त्या कायमस्वरूपी सुरू ठेवाव्यात. मडूरे-रत्नागिरी दरम्यान लोकल पॅसेंजर गाडी (सावंतवाडी-मंडगाव धर्तीवर) तत्काळ सुरू करावी. रेल्वे स्थानकांवरील सुविधा संदर्भात सिंधुदुर्ग, वैभववाडी आणि नांदगाव रेल्वे स्थानकांवर पीआरएस सेवा तातडीने सुरू करावी.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व १० रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना आवश्यक त्या सेवा-सुविधा मिळाव्यात. सध्या कोकण मार्गावर धावणाऱ्या ७५ पैकी १६ जलदगाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबत नाहीत. या गाड्यांना थांबे देण्यात यावेत, यासाठी मागणी करण्यात आली आहे. सावंतवाडी स्टेशनला ‘सावंतवाडी टर्मिनल’ असे नाव देण्यात यावे आणि त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करावा. कसाल रेल्वे स्थानक सुरू करणे, अशा अनेक मागण्या यावेळी शिष्टमंडळाने केल्या.

Comments
Add Comment

दिंडोशीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे खाते बंद, भाजपा आणि शिवसेना किती जागा वाढवणार

मुंबई (सचिन धानजी) : दिंडोशी विधानसभा मतदार संघातून उबाठाचे सुनील प्रभू हे सन २०१४पासून सलग निवडून येत असले तरी

युती, आघाड्यांसाठी जोरदार हालचाली

भाजप-शिवसेनेत मुंबईसाठी तिसरी बैठक; उबाठा-मनसेचे आज ठरणार, काँग्रेस-वंचितच्या वाटाघाटी मुंबई : राज्यातील २९

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यासही भाजपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यास यांनीही अखेर भाजपच्या झेंडा हाती घेतला. धर्मेश

मीरा भाईंदरच्या मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडवणार, मंत्री नितेश राणेंचे आश्वासन

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील उत्तन परिसरातील मच्छीमारांवर होत असलेला अन्याय दूर करून त्यांच्या सर्व समस्या

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘आरोग्य आपल्या दारी’ उपक्रम राबवणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षांचा सत्कार मुंबई : “मुख्यमंत्रीपदी