Nitesh Rane: बेताल वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांवर नितेश राणे संतापले, काय म्हणाले वाचा...

सिंधूदुर्ग:  सनातन धर्माने भारताचं वाटोळं केल्याचं बेताल वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपचे हिंदुत्ववादी नेते राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. "हिंदू दहशतवाद' किंवा 'सनातनी दहशतवाद' ही भाषा भारताच्या हिंदू आणि संत परंपरेला बदनाम करण्यासाठी तयार केलेली व्याख्या आहे. आधी सुशीलकुमार शिंदे मग पृथ्वीराज चव्हाण आणि आता जितेंद्र आव्हाड ती भाषा वापरत आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याशी शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे सहमत आहेत का ? राष्ट्रवादी शरद पवार गटाचीही भूमिका हीच आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावं, असं आव्हान नितेश राणे यांनी दिले आहे.





यासंदर्भात आपल्या "एक्स" अकाउंट वरून दिलेल्या प्रतिक्रियेत नितेश राणे यांनी पुढे म्हटले आहे की, खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ हिंदू धर्म आणि संत परंपरेचा अपमान करायचा हाच आव्हाडांचा अजेंडा असतो. दहशतवाद हा हिंसेशी जोडलेला असतो. जिचा उद्देश लोकशाही, सहिष्णुता आणि समाजविरोधी कट रचणं असतो. सनातन हिंदू परंपरेचा इतिहास हा प्रश्नौत्तरं, संवाद, वैचारिक संघर्ष आणि लोकशाहीचं दर्शन आहे. 'सनातनी दहशतवाद' हा शब्द वापरणं म्हणजे आपल्या इतिहासाची, हिंदू परंपरेची आणि सामाजिक क्रांतीच्या प्रवाहाची थट्टा करण्याचा प्रकार आहे. इथल्या हिंदू समाजानं तुमच्या 'बाटग्या' विचारांना कधी साथ दिली नाही आणि भविष्यातही ते देणार नाहीत. केवळ आपला एक मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे वाट्टोळे करू नका, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment

काजू उत्पादक शेतकऱ्याला जगवण्यासाठी आयात शुल्कात २० टक्क्यांची वाढ करा - आमदार निलेश राणे

- निलेश राणे यांची विधानसभेत मागणी; अमली पदार्थ, गो-हत्या आणि बेकायदा वृक्षतोडीवरून धरले धारेवर मुंबई : कोकणातील

डिझेल खरेदी निविदा प्रक्रिया पूर्ण पारदर्शक होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची ग्वाही

- डिझेल खरेदीत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही मुंबई : एसटी महामंडळाच्या डिझेल खरेदीसंदर्भातील निविदा

स्त्री-भ्रूणहत्या प्रकरणी राज्यभरात धडक मोहिम राबवणार - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी देण्यासंदर्भात समिती नेमून अभ्यास करणार मुंबई : "स्त्री-भ्रूणहत्याप्रकरणी

धक्कादायक! सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी ९ जणांनी विकली किडणी

- सहा सावकारांची संपत्ती गोठवणार; मुख्यमंत्र्यांनी दिले कठोर निर्देश मुंबई : खासगी सावकारांकडून घेतलेल्या

मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा १ मार्चपासून सुरू होणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून

Legislative Council Election 2026 : कोणाचा पत्ता कटणार आणि कोणाला लॉटरी लागणार ? विधान परिषदेच्या 'या' ९ जागा होणार रिक्त!

मुंबई : येत्या १६ मार्च रोजी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी रणधुमाळी उडणार आहे. सध्याचे संख्याबळ