मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज जरांगे लिफ्टमध्ये असताना ती लिफ्ट थेट जमिनीवर कोसळली.या अपघातातून मनोज जरांगे सुखरुप वाचले. जरांगे बीडमध्ये एका रुग्णालयात गेले होते. ते लिफ्टमधून जात असताना पहिल्या मजल्यावरुन लिफ्ट थेट जमिनीवर कोसळली. यावेळी लिफ्टमध्ये मनोज जरांगे यांच्यासोबत त्यांचे निवडक सहकारी होते. लिफ्टचा दरवाजा तोडून मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले.

राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय घेतला आहे. या निर्णयाला आव्हान मिळाल्यामुळे सध्या हा विषय न्यायालयात आहे. न्यायालयीन सुनावणी सुरू असली तरी मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी सातत्याने उपोषण करतात. त्यामुळे त्यांची तब्येत सारखी बिघडत असते. या परिस्थितीत मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात झाला. यामुळे जरांगेंविषयी त्यांच्या समर्थकांनी चिंता व्यक्त केली आहे.

नेमके काय घडले ?

मनोज जरांगे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये एका रुग्णाला भेटण्यासाठी ते शिवाजीराव मेडिकल केअर रुग्णालयात गेले होते. या रुग्णालयात दुसऱ्या मजल्यावर असलेल्या रुग्णाला भेटण्यासाठी जरांगे गेले होते. ते समर्थकांसोबत लिफ्टने दुसऱ्या मजल्यावर जात होते. पण लिफ्ट पहिल्या मजल्यावर असतानाच अपघात झाला. लिफ्ट थेट जमिनीवर कोसळली. लिफ्टमध्ये मनोज जरांगे यांच्यासोबत त्यांचे निवडक सहकारी होते. लिफ्टचा दरवाजा तोडून मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले.

 
Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये