'हिंदूंना बदनाम करण्याचा काही राजकारण्यांचा कट'

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांच्या निवडक नेत्यांनी हिंदूंना बदनाम करण्याचा कट केला. ‘हिंदू दहशतवाद’ किंवा ‘सनातनी दहशतवाद’ ही भाषा भारताच्या हिंदू आणि संत परंपरेला बदनाम करण्यासाठी तयार केलेली व्याख्या आहे. आधी सुशीलकुमार शिंदे मग पृथ्वीराज चव्हाण आणि आता जितेंद्र आव्हाड ती भाषा वापरत आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याशी शरद पवार आणि सुप्रिया सुळे सहमत आहेत का ? राष्ट्रवादी शरद पवार गटाचीही भूमिका हीच आहे का ? असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला.

खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ हिंदू धर्म आणि संत परंपरेचा अपमान करायचा हाच आव्हाडांचा अजेंडा असतो. दहशतवाद हा हिंसेशी जोडलेला असतो, जिचा उद्देश लोकशाही, सहिष्णुता आणि समाजविरोधी कट रचणं असतो. सनातन हिंदू परंपरेचा इतिहास हा प्रश्नौत्तरं, संवाद, वैचारिक संघर्ष आणि लोकशाहीचं दर्शन आहे.

‘सनातनी दहशतवाद’ हा शब्द वापरणं म्हणजे आपल्या इतिहासाची, हिंदू परंपरेची आणि सामाजिक क्रांतीच्या प्रवाहाची थट्टा करण्याचा प्रकार आहे. इथल्या हिंदू समाजानं तुमच्या ‘बाटग्या’ विचारांना कधी साथ दिली नाही आणि भविष्यातही ते देणार नाहीत. केवळ आपला एक मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे वाट्टोळे करू नका, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी हिंदूंना बदनाम करणाऱ्या राजकारण्यांना केले आहे.
Comments
Add Comment

भारताचा जीडीपी ७.३ ते ७.५% दरम्यान राहणार - ग्रँट थॉर्नटन भारत

मुंबई: विख्यात आर्थिक सल्लागार संस्था ग्रँट थॉर्नटन भारतने भारताचा जीडीपी आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ७.३-७.५% वाढू

सेन्सेक्स १०७ व निफ्टी ४६ अंकाने कोसळला शेअर बाजारात गुंतवणूकदारांची निराशा जाणून घ्या नवी स्ट्रॅटेजी!

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात आजही इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. प्रामुख्याने शेअर बाजारात

प्रचार थांबला, चुहा मिटिंग जोरात

मतदारसंघाची विजयाच्या समीकरणाची पायाभरणी मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचा प्रचार अखेर मंगळवारी

ठाकरे बंधूंच्या तोंडी जिहादींची भाषा

राष्ट्रभक्त हिंदूंनी जागरूक राहून मतदान करण्याचे आवाहन मंत्री नितेश राणेंचा घणाघात मुंबई : ‘ठाकरे बंधूंची

कुत्रा चावल्यास मोबदला राज्य सरकारने द्यावा!

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली : कुत्र्यांनी घेतलेला चावा किंवा हल्ल्यामुळे जर कुणी जखमी झाला किंवा

आयोगाच्या नियमामुळे गोंधळात गोंधळ,

प्रचार बंदी नंतरही उमेदवाराला गाजावाजा न करता प्रचार करता येणार? मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या