मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, मराठी भाषेला खऱ्या अर्थाने वैभव प्राप्त करून द्यायचे असेल, तर तिचे संवर्धन करणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे," असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देताना त्यांनी भाषेच्या संवर्धनासोबतच सध्या सुरू असलेल्या राजकीय वादावरही आपली भूमिका स्पष्ट केली.



भाषेवरून होणारी टीका-टिप्पणी थांबवा


सामंत यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना सांगितले की, 'सामना'तून होणाऱ्या टीकेमुळे आम्ही मराठीचा अपमान करतोय असा अर्थ काढणे चुकीचे आहे. भाषेच्या संरक्षणासाठी सकारात्मक चर्चा होणे गरजेचे आहे. जर आपल्याला मराठी भाषेला खऱ्या अर्थाने संरक्षण द्यायचे असेल, तर भाषेबाबतची अनावश्यक टीका-टिप्पणी थांबवावी लागेल, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.



VSR कंपनीबाबत स्पष्टीकरण


विमान/हेलिकॉप्टर सेवा पुरवणाऱ्या VSR कंपनीवरून होत असलेल्या आरोपांवरही उदय सामंत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, "त्या कंपनीबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती किंवा अधिकृत आरोप समोर आलेले नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा प्रवास अत्यंत सुरक्षित आणि निर्धोक व्हावा, हाच आमचा प्राथमिक उद्देश आहे आणि त्याच दृष्टीने काही तांत्रिक मुद्दे मांडण्यात आले आहेत."

Comments
Add Comment

Poison Capsule Case: विषारी कॅप्सूल वाटप प्रकरणात सायको किलरचा मास्टरप्लॅन; AI ला विचारलं नको ते प्रश्न 

मुंबई: मुंबईतील (Mumbai) मोहरम मिरवणुकीदरम्यान विषारी कॅप्सूल वाटप (Poison Capsule Case) करण्याच्या संशयित कटाचा मुंबई

लोकल प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा निर्णय; स्थानकांवर बॅगांची होणार तपासणी

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल रेल्वेत प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांनी

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर