मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, मराठी भाषेला खऱ्या अर्थाने वैभव प्राप्त करून द्यायचे असेल, तर तिचे संवर्धन करणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे," असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देताना त्यांनी भाषेच्या संवर्धनासोबतच सध्या सुरू असलेल्या राजकीय वादावरही आपली भूमिका स्पष्ट केली.



भाषेवरून होणारी टीका-टिप्पणी थांबवा


सामंत यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना सांगितले की, 'सामना'तून होणाऱ्या टीकेमुळे आम्ही मराठीचा अपमान करतोय असा अर्थ काढणे चुकीचे आहे. भाषेच्या संरक्षणासाठी सकारात्मक चर्चा होणे गरजेचे आहे. जर आपल्याला मराठी भाषेला खऱ्या अर्थाने संरक्षण द्यायचे असेल, तर भाषेबाबतची अनावश्यक टीका-टिप्पणी थांबवावी लागेल, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.



VSR कंपनीबाबत स्पष्टीकरण


विमान/हेलिकॉप्टर सेवा पुरवणाऱ्या VSR कंपनीवरून होत असलेल्या आरोपांवरही उदय सामंत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, "त्या कंपनीबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती किंवा अधिकृत आरोप समोर आलेले नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा प्रवास अत्यंत सुरक्षित आणि निर्धोक व्हावा, हाच आमचा प्राथमिक उद्देश आहे आणि त्याच दृष्टीने काही तांत्रिक मुद्दे मांडण्यात आले आहेत."

Comments
Add Comment

IIT Bombay Hostel Canteen : आयआयटी बॉम्बेच्या 2 हॉस्टेल मेसला टाळं! FDAची मोठी कारवाई; मुंबईतील 4 खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA)

FYJC Admission 2026 : अकरावी प्रवेशाची शेवटची संधी? आज लागणार कॉलेज अलॉटमेंट लिस्ट; विद्यार्थ्यांनी ‘हे’ नक्की करा!

मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

BMC News : महापालिकेच्या सहायक आयुक्तांमध्येच धुसफुस; व्हॉट्सअप ग्रुपवरुन बाहेर पडल्याने नाराजी उघड

- महापालिका आयुक्तांना आता याप्रकरणात लक्ष घालण्याची वेळ मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या

Water Storage Declining : महापालिका धरणांमधील पाणीसाठा घटतोय

- तब्बल ९० टक्क्यांच्या पुढे गेलेला साठा चार दिवसांत दीड टक्क्यांनी झालाय कमी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई पाणी

Global Warming : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका; मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा

- भाजप नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) भविष्यात उद्भवणाऱ्या जागतिक तापमान वाढ (ग्लोबल

Ganeshotsav 2026 ST Buses : बाप्पाच्या आगमनासाठी एसटी सज्ज! मुंबई, ठाणे, पालघरमधून धावणार शेकडो जादा बसेस; ‘या’ तारखेपासून विशेष सेवा

मुंबई : गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असून, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे.