मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, मराठी भाषेला खऱ्या अर्थाने वैभव प्राप्त करून द्यायचे असेल, तर तिचे संवर्धन करणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे," असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देताना त्यांनी भाषेच्या संवर्धनासोबतच सध्या सुरू असलेल्या राजकीय वादावरही आपली भूमिका स्पष्ट केली.



भाषेवरून होणारी टीका-टिप्पणी थांबवा


सामंत यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना सांगितले की, 'सामना'तून होणाऱ्या टीकेमुळे आम्ही मराठीचा अपमान करतोय असा अर्थ काढणे चुकीचे आहे. भाषेच्या संरक्षणासाठी सकारात्मक चर्चा होणे गरजेचे आहे. जर आपल्याला मराठी भाषेला खऱ्या अर्थाने संरक्षण द्यायचे असेल, तर भाषेबाबतची अनावश्यक टीका-टिप्पणी थांबवावी लागेल, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.



VSR कंपनीबाबत स्पष्टीकरण


विमान/हेलिकॉप्टर सेवा पुरवणाऱ्या VSR कंपनीवरून होत असलेल्या आरोपांवरही उदय सामंत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, "त्या कंपनीबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती किंवा अधिकृत आरोप समोर आलेले नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा प्रवास अत्यंत सुरक्षित आणि निर्धोक व्हावा, हाच आमचा प्राथमिक उद्देश आहे आणि त्याच दृष्टीने काही तांत्रिक मुद्दे मांडण्यात आले आहेत."

Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध