सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप


वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे गुन्हेगार देखील मारले गेले आहेत. दहशतवाद्यांना मारण्यासाठी तुम्हाला फोन करून विचारायचे का? त्यांना पळून जाण्याची संधी द्यायची का?, अशा थेट आणि बोचऱ्या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीका केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी वाराणसी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत २,१८३ कोटी रुपयांच्या ५२ विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. या प्रकल्पांमध्ये रस्ते बांधकाम आणि रुंदीकरण, रुग्णालयांचे आधुनिकीकरण, शैक्षणिक संस्थांमध्ये सुधारणा, धार्मिक पर्यटनासाठी पक्क्या घाटांचे बांधकाम, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीज आणि पार्किंग सुविधांचा विस्तार, तलावांचे नूतनीकरण, ग्रंथालये आणि प्राणी रुग्णालयांची स्थापना अशा कामांचा समावेश आहे.


पीएम-किसान सन्मान निधी योजनेच्या २०व्या हप्त्याचे वितरणही पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना संबोधितही केले. मोदी यांनी अखिलेश यादव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.


पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना ठार मारण्याच्या वेळेवरून अखिलेश यादव यांनी प्रश्न उपस्थित केल्याने पंतप्रधान मोदी यांनी नाराजी व्यक्त केली. ऑपरेशन सिंदूरनंतर मी प्रथमच वाराणसीला आलो आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. त्यांच्या कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना मी बाबा विश्वनाथ यांच्याकडे केली होती.


त्यावेळी मी हल्ल्याचा बदला घेण्याचे वचन दिले होते. ते वचन मी पूर्ण केले आहे. ऑपरेशन सिंदूर हे काशी विश्वेश्वराला समर्पित असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

Krishna controversy : 'श्रीकृष्ण मुस्लिम होता', मौलानाचा दावा; व्हायरल व्हिडिओवरून नवा वाद, हिंदू संघटनांकडून कारवाईची मागणी

श्रीकृष्णावरून वाद; हिंदू संघटना संतापली मथुरा : श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाच एका

Supreme Court on Three-Language Policy : त्रिभाषा धोरणावर सर्वोच्च न्यायालयाची तीव्र नाराजी; 'नववीपासून नवी भाषा म्हणजे विद्यार्थ्यांवर अनावश्यक ताण'

नवी दिल्ली : इयत्ता नववीपासून त्रिभाषा धोरण लागू करण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी

Bay of Bengal Tragedy : बंगालच्या उपसागरात रोहिंग्यांच्या दोन बोटी उलटल्या; ५०० हून अधिक जण मृत्युमुखी पडल्याची भीती

ढाका/यांगून : म्यानमारमधून पलायन करणाऱ्या रोहिंग्या निर्वासितांवर मोठे संकट कोसळले आहे. बंगालच्या उपसागरात

Pimple Solution : चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येतात? 'या' सोप्या उपायांनी मिळवा स्वच्छ, नितळ त्वचा

पिंपल्स का

ISRO scientists resign : मोठी बातमी! गगनयानसारख्या मोहिमांवर काम करणाऱ्या १०० हून अधिक शास्त्रज्ञांनी सोडली 'इस्रो'; राजीनाम्यांचे नियम आता होणार कडक!

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (ISRO) एका मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. गगनयानसारख्या देशाच्या अत्यंत

Shri Jagannath Rath Yatra 2026 : आजपासून श्रीजगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ! २४ जुलैपर्यंत रंगणार भक्तिमय सोहळा; जाणून घ्या महत्त्व, परंपरा आणि संपूर्ण वेळापत्रक

पुरी (ओडिशा): सनातन धर्मातील सर्वात पवित्र आणि भव्य उत्सवांपैकी एक असलेल्या श्रीजगन्नाथ रथयात्रेला आज (१६ जुलै)