पुण्यातील यवतमध्ये परिस्थिती नियंत्रणात, संचारबंदी लागू

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात एका व्यक्तीने स्टेटसला एक संदेश ठेवला होता. या स्टेटसवरुन गावात शुक्रवारी १ ऑगस्ट रोजी हिंसा झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. आता यवतमध्ये संचारबंदी लागू आहे. विना परवानगी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. यवतमधील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. हिंसेप्रकरणी गुन्हे दाखल करुन पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. कारवाईसाठी एक पुरावा म्हणून पोलिसांनी कॅमेरा फूटेजची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी यवतचे व्हायरल व्हिडीओ, प्रसारमाध्यमांकडे असलेले व्हिडीओ तसेच गावात असलेल्या कॅमेऱ्यांच्या फूटेजची तपासणी होणार आहे.

यवतमध्ये संचारबंदी लागू असल्यामुळे शनिवार २ ऑगस्ट रोजी गावातील शाळांना बंद ठेवले आहे. गावातील सर्व दुकानं आणि व्यापार बंद आहे. नागरिकांनी घोळक्याने उभे राहू नये, कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन पोलीस सातत्याने करत आहेत. शुक्रवारी हिंसा करणाऱ्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे.

शुक्रवारी सकाळी एका तरुणाने मध्यप्रदेश इथे एका ६० वर्षाच्या अध्यात्मिक गुरुने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला असं एका चॅनेलवर आलेल्या बातमीचं स्टेटस ठेवलं होतं. या स्टेटसवरुन यवतमध्ये शुक्रवारी हिंसा झाली होती. या हिंसेप्रकरणी पोलिसांनी २० पेक्षा जास्त नागरिकांना अटक केली आहे.

याआधी चार दिवसांपूर्वी यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी तणाव निर्माण झाला होता. यावरुन यवतसह दौंड तालुक्यात बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. पोलिसांनी तपास करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्याला अटक केल्यानंतर वातावरण शांत झाले होते. पण शुक्रवारी स्टेटसवरुन हिंसा झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.
Comments
Add Comment

America: अमेरिका एफ-१५ पायलटला किती पगार देते? ही रक्कम ऐकून तुम्हाला बसेल धक्का

मुंबई: अमेरिकेने इराणमध्ये अडकलेल्या आपल्या एफ-१५ पायलट्सला वाचवण्यासाठी एक मोहीम सुरू केली. ही मोहीम यशस्वी

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून

Matunga Fire : माटुंगा वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना भीषण आग; धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी उभ्या असलेल्या ट्रेनच्या