पुण्यातील यवतमध्ये परिस्थिती नियंत्रणात, संचारबंदी लागू

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात एका व्यक्तीने स्टेटसला एक संदेश ठेवला होता. या स्टेटसवरुन गावात शुक्रवारी १ ऑगस्ट रोजी हिंसा झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. आता यवतमध्ये संचारबंदी लागू आहे. विना परवानगी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. यवतमधील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. हिंसेप्रकरणी गुन्हे दाखल करुन पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. कारवाईसाठी एक पुरावा म्हणून पोलिसांनी कॅमेरा फूटेजची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी यवतचे व्हायरल व्हिडीओ, प्रसारमाध्यमांकडे असलेले व्हिडीओ तसेच गावात असलेल्या कॅमेऱ्यांच्या फूटेजची तपासणी होणार आहे.

यवतमध्ये संचारबंदी लागू असल्यामुळे शनिवार २ ऑगस्ट रोजी गावातील शाळांना बंद ठेवले आहे. गावातील सर्व दुकानं आणि व्यापार बंद आहे. नागरिकांनी घोळक्याने उभे राहू नये, कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन पोलीस सातत्याने करत आहेत. शुक्रवारी हिंसा करणाऱ्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे.

शुक्रवारी सकाळी एका तरुणाने मध्यप्रदेश इथे एका ६० वर्षाच्या अध्यात्मिक गुरुने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला असं एका चॅनेलवर आलेल्या बातमीचं स्टेटस ठेवलं होतं. या स्टेटसवरुन यवतमध्ये शुक्रवारी हिंसा झाली होती. या हिंसेप्रकरणी पोलिसांनी २० पेक्षा जास्त नागरिकांना अटक केली आहे.

याआधी चार दिवसांपूर्वी यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी तणाव निर्माण झाला होता. यावरुन यवतसह दौंड तालुक्यात बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. पोलिसांनी तपास करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्याला अटक केल्यानंतर वातावरण शांत झाले होते. पण शुक्रवारी स्टेटसवरुन हिंसा झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.
Comments
Add Comment

baba adhav passed away : कष्टकऱ्यांचा आधार हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचे निधन; वयाच्या ९५ व्या वर्षी बाबा आढावांनी घेतला अखेरचा श्वास

पुणे : राज्यातील पुरोगामी चळवळीला आणि शेतकरी-कामगार वर्गाला मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा

जास्तीचे शुल्क न आकारता प्रवाशांचे पैसे परत करा, मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश

पुणे : 'इंडिगो' च्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसलेल्या प्रवाशांकडून जास्तीचे शुल्क न आकारता प्रवाशांचे पैसे परत करा

राज्यातील ४९ लाख जमिनी अधिकृत होणार

नागपूर : महाराष्ट्र सरकारने शेतजमिनीच्या तुकडेबंदी कायद्यात ऐतिहासिक सुधारणा करत मुंबई, पुणे, नागपूरसह

अज्ञात वैमानिकाच्या पत्रात 'इंडिगो'वर ‘गैरव्यवस्थापन,’ आणि ‘अपमान’ केल्याचा आरोप

नवी दिल्ली : देशातील एक विमान सेवा कंपनी सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेला

बाणेरमधील आरोपीला दिल्लीतून पाच महिन्यांनंतर अटक

पुणे : बाणेर भागात रिक्षाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यू प्रकरणी एकाला दिल्लीतून अटक

'या' तारखेला १०३ वर्षांचा ब्रिटिशकालीन पूल पाडणार, कसं असेल मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक?

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील जवळपास १०३ वर्षे जुना असलेला ब्रिटिशकालीन रोड ओव्हर ब्रिज अखेर