कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. या बैठकीत पुढील प्रमुख घाटमार्गांवर सविस्तर चर्चा करण्यात आली


—अणुस्करा–गावडी (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) ते लांजा (जि. रत्नागिरी) येथील भांबेड–धनगरवाडी रस्ता.


पावनखिंड–गजापूर–विशाळगड पायथा (ता. शाहूवाडी) ते संगमेश्वर तालुक्यातील देवडे–भोवडे जोडणारा नवीन घाटमार्ग.


राष्ट्रीय महामार्ग १९३ पासून बाजारभगाव–किसरूळ–काळजवडे–पोंबरे–कोलीक–पडसाळी ते किजिडी घाटास जोडणारा रस्ता.


बैठकीस आमदार विनायक कोरे, आमदार किरण सामंत, आमदार चंद्रदीप नरके, सचिव (रस्ते) संजय दशपुते, मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) संतोष शेलार, मुख्य अभियंता (कोकण) शरद राजभोज, अधिक्षक अभियंता (कोल्हापूर) तुषार बुरूड, कार्यकारी अभियंता (विशेष प्रकल्प) चंद्रकांत आयरेकर, जिल्हा वन अधिकारी (कोल्हापूर) संजय वाघमोडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


कोल्हापूर–रत्नागिरी दरम्यानचे हे रस्ते देवडे–भोवडे ते विशाळगड घाट, काजिर्डा ते पडसाळी घाट आणि भांबेड ते गावडी घाट अशा तीन प्रमुख घाटांना जोडतात. सह्याद्री पर्वतरांगांतील लांजा व संगमेश्वर तालुक्यातील अनेक मुख्य गावांना हे मार्ग जोडत असल्याने दळणवळण सुलभ होईल, घाटमाथ्यावरील नागरिकांचे जीवनमान उंचावेल तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्हे थेट जोडले जातील, असे मंत्री भोसले यांनी सांगितले.


वन विभागाच्या आवश्यक सर्व परवानग्या पूर्ण करून रस्त्यांच्या कामांतील अडथळे तातडीने दूर करावेत. आवश्यक ठिकाणी पूल, दिशादर्शक फलक बसवावेत, घाटमार्गांसाठी योग्य सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच या मार्गांवर एसटी बसेस नियमित धावतील अशा पद्धतीने रस्त्यांची आखणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Comments
Add Comment

बोईसर येथील सामुहिक आदिवासी विवाह सोहळ्यातील नवविवाहित जोडप्यांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद

२०१ आदिवासी जोडप्यांना भावी आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा शिवसेना उपनेते जगदीश धोडी आणि सहकाऱ्यांचे केले विशेष

10% water cut in Mumbai : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! मुंबईत केवळ १९ टक्के पाणीसाठा शिल्लक; जुलै-ऑगस्टच्या नियोजनासाठी पालिकेची धावपळ

मुंबई : मुंबईकरांवर सध्या पाणीटंचाईचे गडद संकट (Mumbai’s seven lakes remain under pressure) घोंघावत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या

Mumbai's Garib Nagar : वांद्रे 'गरीब नगर'मधील अतिक्रमण हटाव मोहीम अंतिम टप्प्यात; आज राडारोडा उचलण्याचे काम पूर्ण होणार

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व (Mumbai Bandra East) भागात असलेल्या 'गरीब नगर' (Garib Nagar) झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांवरील

एकल महिलांसाठी राज्य सरकार आणणार धोरण

मुंबई : राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार

Mumbai Airport Cocaine Seized : मुंबई विमानतळावर ११.२५ कोटींचे कोकेन जप्त; शरीरामध्ये लपवून ड्रग्जची तस्करी, चौघांना अटक

मुंबई : अंमली पदार्थ तस्करीविरुद्धच्या एका मोठ्या कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय पथकाने

राज्यात अचानक इंधन मागणीत ३० टक्के वाढ

 मुख्यमंत्र्यांना साठेबाजीचा संशय, जिल्हाधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश मुंबई : देशभरात गेल्या आठ दिवसांत