जलप्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचे एक पाऊल पुढे

मनपाकडून सहा प्रकारच्या रंगांचे वाटप


मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला अधिक बळकटी यावी यासाठी पालिकेकडून मूर्तिकारांना पर्यावरणपूरक रंग पुरवठा करण्यात येणार आहे.
यंदा मोफत शाडू माती, ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर मूर्ती घडविण्यासाठी मंडपाकरीता जागा अशा सुविधा पालिकेकडून उपलब्ध करून दिल्या आहेत.
या सुविधांमध्ये भर घालत मूर्तिकारांना पर्यावरणपूरक रंग पुरवठा करण्यात येणार आहे.


एकूण सहा पर्यावरणपूरक रंगांचा यामध्ये समावेश आहे. यात ७ हजार ८०० लीटर रंग आणि ३ हजार लीटर इको प्रायमर पुरविण्यात येणार आहे. मूर्तिकारांनी या रंगांचा वापर करून गणरायाच्या मूर्ती रंगवाव्यात. जेणेकरून जलप्रदूषण रोखण्यास मदत होईल.


बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त पालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून निरनिराळ्या नागरी सेवा-सुविधा पुरविल्या जात आहेत.


मुंबई महानगरात शाडू मातीच्या मूर्ती घडविण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्तींची प्रतिष्ठापणा व्हावी यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत शाडू माती पुरविण्यात आली आहे. आतापर्यंत ९५२ टन माती पुरविण्यात आली आहे. यासोबतच ९९७ मूर्तिकारांना मूर्ती घडविण्यासाठी मंडपासाठी जागाही देण्यात आली.



पर्यावरणपूरक रंगांचाच वापर करा मूर्ती रंगविण्यासाठी वापरले जाणारे रंग विशेषत


रासायनिक रंग हे पर्यावरणासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे विसर्जनाच्या वेळी जलस्रोतांचे प्रदूषण होऊन सार्वजनिक आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात. या शक्यता गृहीत धरून महानगरपालिकेने मूर्तिकारांना आवाहन केले आहे की शक्य तितक्या पर्यावरणपूरक रंगांचाच वापर करावा आणि जलाशयांचे प्रदूषण टाळावे.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला