बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर ३६ मीटर उंच पुलाची उभारणी

अभियांत्रिकी क्षेत्रात पूल ठरणार चमत्कार


अहमदाबाद : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे. साबरमती स्थानकापासून सुमारे १ किमी आणि अहमदाबाद स्थानकापासून सुमारे ४ किमी हे अंतर आहे. हा पूल भारतातील प्रमुख पश्चिमवाहिनी नद्यांपैकी एक असलेल्या साबरमती नदीवर बांधण्यात येत आहे.


या हायस्पीड मार्गावर सध्या अहमदाबादमधील साबरमती नदीवर मोठा पुल बांधला जात आहे. या पुलाची उंची ३६ मीटर असून म्हणजेच सुमारे अंदाजे ११८ फूट उंची इतका हा पूल उंच आहे. एकूण ४८० मीटर लांबीचा हा पूल, पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद–दिल्ली मुख्य मार्गालगत बांधला जात आहे. ज्याची उंची मीटरमध्ये सुमारे १४.८ मीटर इतकी आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर तो एक इंजिनियरिंगचा चमत्कार ठरणार आहे.


अहमदाबाद जिल्ह्यात बुलेट ट्रेनचा मार्ग उड्डाणपूल, पूल, रेल्वे मार्ग आणि मेट्रो कॉरिडॉर यांसारख्या अनेक इन्फास्ट्रक्चर मधून बांधला जात आहे. भारतीय महामार्ग काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्वाधिक उंचीच्या बांधकाम बिंदूपासून ५.५ मीटर इतके अनिवार्य उभे अंतर राखण्यासाठी, साबरमती नदीवरील पुलाचे खांब वाढीव उंचीने तयार करण्यात आले आहेत. या पुलावर एकूण आठ गोलाकार खांब असणार असून ते ६ ते ६.५ मीटर व्यासाचे बांधले जात आहेत. यापैकी चार खांब नदीच्या पात्रात, दोन खांब नदीच्या काठावर (प्रत्येक बाजूला एक) आणि दोन खांब नदीच्या काठाच्या बाहेर उभारण्यात आले. नदीच्या प्रवाहात अडथळा कमीत कमी राहावा यासाठी पुलाची रचना ठरवून करण्यात आली आहे.


मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील बहुतांश नदी पूल सुमारे ४० मीटर लांबीच्या छोट्या स्पॅनवर आधारित असलेले आहेत. तरी नदीच्या पात्रातील खांबांची संख्या कमी करण्यासाठी या पुलामध्ये ५० ते ८० मीटर लांबीच्या मोठ्या स्पॅनचा वापर करण्यात आला आहे. या पुलामध्ये प्रत्येकी ७६ मीटर लांबीचे ५ स्पॅन आणि प्रत्येकी ५० मीटर लांबीच्या २ स्पॅनचा समावेश आहे. प्रत्येक स्पॅनमध्ये २३ विभाग (सेगमेंट) असून ते सर्व ऑन-साईट (स्थळावरच) बांधकामाच्या पद्धतीने कास्ट केले जात आहेत.


हा पूल बॅलन्स्ड कँटीलिव्हर पद्धतीने बांधण्यात येत आहे, हे एक विशेष बांधकाम तंत्र असून, जे खोल पाण्यातील आणि नद्यांवरील दीर्घ अंतराच्या पुलांसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत