Anil Ambani: अनिल अंबानी यांच्याविरोधात 'लूक आऊट' नोटीस

परवानगी शिवाय देश सोडण्यास मनाई

प्रतिनिधी: अनिल अंबानी यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate ED) लूक आऊट नोटीस काढली आहे. त्यांना देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून खबर दारी घेतली जाणार असून देशाबाहेर विना परवानगी जाण्यास म ज्जाव केला आहे. देशातील विमानतळ व ट्रान्सिटच्या जागांवर विशेष 'नाकेबंदी' करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना देशाबाहेर जा ण्याचे मार्ग रोखण्यात आल्याचे सूत्रांनी प्रसारमाध्यमांना म्हटले आहे. या घटनेनंतर रिलायन्सचे अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढ ल्या आहेत. इतकेच नाही तर अनिल अंबानी यांना ५ तारखेला ईडीने १७००० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडून काल खुलासा करत ईडीने टाकलेल्या छाप्यानंतर त्याचा कुठलाही परिणाम आपल्या दैनंदिन कामकाजावर अथवा कंपनीवर पडणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. संबंधित प्रकरणात १०००० कोटी फंडाची दुसरीकडेच वळ वणी झाल्याचा आरोप जुना घेतलेल्या कर्जासंबधित असून नव्या येस बँकेच्या कर्ज प्रकाराशी संबंधित त्याचा नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले होते तसेच ६५०० कोटींच्या कर्जासाठी १०००० कोटी वळवले असल्याचा दावा खोटा असल्याचं सांगितले. ही बातमी केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी केला असल्याचा दावा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने केला होता.

मागील आठवड्यातच अंबानी यांच्या कंपनीशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीने धाडी टाकल्या होत्या. ३० ऑगस्टलाही कंपनीशी संबंधित व्यक्तींच्या ठिकाणावर छापेमारी करण्यात आली होती. त्याचा च परिपाक म्हणून आता येस बँक प्रकरणासह स्टेट बँककडून घे तलेल्या कर्जासंबधित ही एकत्र कारवाई ईडीकडून केली जात आहे. एसबीआयने अनिल अंबानी यांच्यावर 'Fraud' हा शिक्का आ पल्या कागदपत्रात मारला होता असे स्वतः रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने एक्सचेंजला कळवले होते. त्यानंतर मोठ्या गदारोळानंतर अनि ल अंबानी हे प्राधिकरणाकडे दाद मागण्यास गेले जिथे त्यांनी आ पल्याला आपले म्हणणे मांडण्याचा पुरेसा वेळ दिला गेला नाही असे स्पष्ट केले. त्या युक्तिवादानंतर एसबीआयने हा शब्द हटवला. दरम्यान कथित प्रकरण एसबीआयकडून घेतलेले कर्ज वेगळ्या का रणासाठी वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. एसबीआय प्रकरणातही ३००० कोटींचे कर्ज आपल्या हातचालाखीने भलतीकडेच वळवण्यात आल्याचा आरोप नियामक मंडळा ने केला आहे. २०१७ ते २०१९ या कालावधीत ही रक्कम बोगस शेल कंपनीच्या नावावर वळवण्यात आली असा ठपका अंबानींवर आहे.

या प्रकरणात येस बँकेच्या काही अधिकारी वर्गाला कर्ज मंजूर करण्यासाठी 'लाभ' झाल्याचा ठपकाही ठेवण्यात आला. त्यामुळे याविषयीही चौकशी सुरू आहे. तसेच येस बँक व एसबीआय प्रकर णात ' मनी लॉन्ड्रिंग' अंतर्गत अनिल अंबानीची चौकशी होणारआहे. त्यामुळे एकूणच अंबानी यांच्या चौकशी विरोधात अडचणी वाढल्या आहेत.
Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक