वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली होती. हे प्रकरण अद्याप ताजं आहे. त्यानंतर वसई-विरार शहर महानगरपालिकेतील नगररचना विभागाचे निलंबित उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्याविरुद्ध बेहिशेबी संपत्तीप्रकरणी अखेर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. आचोळे पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम १३ (१)(ब) सह १३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून करण्यात आली असून, तपासाअंती रेड्डी यांच्याकडे कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले होते. याअंतर्गत ED ने यापूर्वी वसईतील तसेच हैदराबाद येथील निवासस्थानी छापे टाकून तब्बल २३ कोटी २५ लाख ४० हजार रुपयांचे हिरे-जडजवाहीर आणि ८ कोटी ३२ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली होती.तपासानुसार, रेड्डी यांनी वसई विरार महानगरपालिकेमध्ये कार्यरत असताना आपल्या पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवली होती. त्यांच्याकडे आढळलेली संपत्ती ही त्यांच्या अधिकृत उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा अत्यंत जास्त असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.


ही संपत्ती मिळवताना त्यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर, उपअधीक्षक दत्ताराम कराडे व तपासी अधिकारी रविंद्र परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


तक्रारदाराच्या तक्रारीवरून आणि चौकशीअंती आज दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लवकरच रेड्डी यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल