केनिंग्टन ओव्हल कसोटीत भारताचा पहिला डाव 'एवढ्या' धावांत आटोपला

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचा पहिला डाव २२४ धावांत आटोपला. इंग्लंडला भारताचे सर्व फलंदाज बाद केले. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या इंग्लंडने दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत एक बाद १०९ धावा केल्या. सध्या इंग्लंड ११५ धावांनी पिछाडीवर आहे. झॅक क्रॉली आणि ऑली पोप खेळत आहेत. भारताच्या आकाशदीपने बेन डकेटला बाद केले. बेन डकेट ४३ धावा करुन ध्रुव जुरेलकडे झेल देऊन परतला.

याआधी भारताने पहिल्या डावात सर्वबाद २२४ धावा केल्या. भारताकडून करुण नायरने सर्वाधिक ५७ धावा केल्या.भारताला ३८ अवांतर चेंडूंचा फायदा मिळाला. यशस्वी जयस्वाल २, केएल राहुल १४, साई सुदर्शन ३८, कर्णधार शुभमन गिलने (धावचीत) २१, रविंद्र जडेजाने ९, यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने १९, वॉशिंग्टन सुंदरने २६ धावांचे योगदान दिले. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा शून्य धावा करुन बाद झाले तर आकाशदीप शून्य धावांव नाबाद राहिला. भारताकडून करुण नायर आणि साई सुदर्शन हे दोनच फलंदाज दीर्घकाळ मैदानावर पाय रोवून उभे होते. इंग्लंडकडून गस अ‍ॅटकिन्सन पाच, जोश टंगने तीन आणि ख्रिस वोक्सने एक बळी बळी घेतला.

Comments
Add Comment

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे

वन डे रँकिंगमध्ये स्मृती मानधनाचे वर्चस्व कायम

मुंबई : आयसीसी महिला एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने चमकदार कामगिरी केली

‘क्लच चेस’मध्ये गुकेशचा हिकारू नाकामुरावर पलटवार

मुंबई  : ‘चॅम्पियन्स शोडाउन’ या प्रतिष्ठित रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय विश्वविजेता डी.

IND vs AUS : सेमीफायनलवर पावसाचं सावट, सामना रद्द झाल्यास काय होणार?

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक आता अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचला आहे. उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया

हर्षित राणाची जागा जाणार? टीम इंडियात आणखी एका खेळाडूचे पुनरागमन !

मुंबई : टीम इंडियामध्ये आणखी एक वरिष्ठ खेळाडू संघात परतण्याच्या तयारीत असून, त्याच्या पुनरागमनामुळे मुख्य

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची प्रकृती सुधारतेय: भारतात कधी परतणार?

ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा दुखापतीच्या संकटात सापडला आहे. नुकताच