केनिंग्टन ओव्हल कसोटीत भारताचा पहिला डाव 'एवढ्या' धावांत आटोपला

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचा पहिला डाव २२४ धावांत आटोपला. इंग्लंडला भारताचे सर्व फलंदाज बाद केले. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या इंग्लंडने दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत एक बाद १०९ धावा केल्या. सध्या इंग्लंड ११५ धावांनी पिछाडीवर आहे. झॅक क्रॉली आणि ऑली पोप खेळत आहेत. भारताच्या आकाशदीपने बेन डकेटला बाद केले. बेन डकेट ४३ धावा करुन ध्रुव जुरेलकडे झेल देऊन परतला.

याआधी भारताने पहिल्या डावात सर्वबाद २२४ धावा केल्या. भारताकडून करुण नायरने सर्वाधिक ५७ धावा केल्या.भारताला ३८ अवांतर चेंडूंचा फायदा मिळाला. यशस्वी जयस्वाल २, केएल राहुल १४, साई सुदर्शन ३८, कर्णधार शुभमन गिलने (धावचीत) २१, रविंद्र जडेजाने ९, यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने १९, वॉशिंग्टन सुंदरने २६ धावांचे योगदान दिले. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा शून्य धावा करुन बाद झाले तर आकाशदीप शून्य धावांव नाबाद राहिला. भारताकडून करुण नायर आणि साई सुदर्शन हे दोनच फलंदाज दीर्घकाळ मैदानावर पाय रोवून उभे होते. इंग्लंडकडून गस अ‍ॅटकिन्सन पाच, जोश टंगने तीन आणि ख्रिस वोक्सने एक बळी बळी घेतला.

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे