२५% ट्रम्प टॅरिफचा धोका टळला! एक आठवड्यासाठी दिलासा

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर २५ टक्के टॅरिफची घोषणा केली होती, जी १ ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून लागू होणार होती. परंतु आता ती एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. अमेरिकेने जारी केलेल्या नवीन निर्देशात, आता हा टॅरिफ ७ दिवसांनी बांगलादेश, ब्राझील आणि भारतासह इतर देशांवर लादला जाईल, जो ७ ऑगस्ट २०२५ पासून लागू होईल.


बुधवारी, डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक भारतासह अनेक देशांवर टॅरिफची घोषणा करून जगात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. भारतावर २५ टक्के टॅरिफची घोषणा करताना ट्रम्प म्हणाले होते की व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी हा टॅरिफ लावला जात आहे. याशिवाय, रशियाकडून तेल आणि संरक्षण उत्पादने खरेदी केल्यामुळे हा दंड जाहीर करण्यात आला आहे.


मात्र, आता अमेरिकेने नवीन आदेशानुसार सर्व देशांवर लादलेले टॅरिफ १ आठवड्यासाठी पुढे ढकलले आहे, म्हणजेच आता टॅरिफ लावण्याची नवीन अंतिम तारीख ७ ऑगस्ट आहे.



राष्ट्रीय हितासाठी शक्य ते सर्व पाऊल!


ज्यावर भारताने थेट शब्दात सांगितले की राष्ट्रीय हितासाठी प्रत्येक शक्य ती गोष्ट केली जाईल. त्याच वेळी, एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले होते की भारत वाटाघाटीच्या टेबलावर अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर देईल. लोकसभेत बोलताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले होते की, अमेरिका आणि भारतामध्ये १० ते १५ टक्के टॅरिफ बाबत चर्चा झाली होती.  राष्ट्रीय हितासाठी प्रत्येक शक्य ते पाऊल उचलले जाईल असेही त्यांनी पुढे सांगितले होते.



अमेरिकेला भारताकडून काय हवे आहे?


भारतावर अतिरिक्त दबाव वाढवण्यासाठी अमेरिका शुल्क लादत आहे. भारताने शक्य तितक्या लवकर त्याच्या कृषी आणि दुग्धजन्य क्षेत्रांवर तडजोड करावी आणि करार करावा अशी त्याची इच्छा आहे, परंतु भारत याला सहमत नाही. भारताचे म्हणणे आहे की ते कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेची शेती आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी भारतीय बाजारपेठ उघडू शकत नाही.


अमेरिका भारताकडे त्यांच्या शेती आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी, विशेषतः मांसाहारी दूध आणि जेनेटिकली मोडिफाइड (GM) पिकांसाठी बाजारपेठ उघडण्याची आणि यावरील कर कमी करण्याची मागणी करत आहे, ज्यामुळे सध्या व्यापार करार होण्यास अडचण होत आहे.  अमेरिका यामध्ये शुल्कातून १०० टक्के सूट मागते आहे.



भारत अमेरिकेची मागणी का पूर्ण करू इच्छित नाही?


भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने दूध पवित्र मानले जाते आणि मांसाहारी चारा खाणाऱ्या गुरांपासून मिळवलेले दूध (मांसाहारी दूध) भारताला मान्य नाही. भारताला दोन्ही देशांमधील संतुलित करार हवा आहे, जो १४० कोटी लोकांच्या, विशेषतः ७० कोटी शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करतो. ते अन्न सुरक्षा, शेतकऱ्यांचे हित आणि धोरणात्मक स्वायत्ततेला प्राधान्य देऊ इच्छिते.

Comments
Add Comment

Prince Harry Meghan Markle UK Return : सहा वर्षांचा ‘वनवास’ संपणार? प्रिन्स हॅरी आणि मेगन ब्रिटनमध्ये परतण्याच्या तयारीत; मुलं शाही कुटुंबाच्या जवळ जाणार

लंडन : ब्रिटिश शाही कुटुंबापासून दूर झाल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल

Gold mine collapses : खोदकामादरम्यान सोन्याची खाण कोसळली; 30 कामगारांचा मृत्यू, अनेक जण अडकले

बांगुई: मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकामध्ये सोन्याची खाण कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. देशाच्या पश्चिम भागातील

Pakistan Saudi Arabia : 'सऊदी अरबमध्ये भीक मागू नका’; पाकिस्तानने हज-उमराह यात्रेकरूंना का दिली कडक ताकीद?

इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने आपल्या नागरिकांना सौदी अरेबियात भीक मागू नये आणि परवानगीशिवाय पैसे गोळा करू

Donald Trump : भारताकडून शिका!’ ट्रम्प यांचा अमेरिकेच्या निवडणूक व्यवस्थेवर निशाणा; SAVE Act साठी दबाव

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा SAVE America Act मंजूर करण्यासाठी काँग्रेसवर

Hayden Panettiere Passes Away : बालकलाकार ते हॉलीवूड स्टार! 'हिरोज' फेम अभिनेत्री हेडन पॅनेटीयरचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन

लॉस एंजिलीस : हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी 'हेडन

Indonesia Earthquake : इंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का; 5.7 तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती

इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा