गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना मिळणार टोल माफी

मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवात दरवर्षी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे यंदाही गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी देण्याचा निर्णय घेण्यात येणार असून याचाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे नगर विकास विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.


२७ ऑगस्ट रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार असून ६ सप्टेंबरला विसर्जन होणार आहे. मुंबई-बंगळुरू महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, अटल सेतू आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील टोलनाक्यांवर ही सवलत दिली जाणार असल्याची माहिती नगरविकास विभागातील अधिकाऱ्याने दिली.


गणेशोत्सवाला काही दिवसांचा अवधी असला तरी सरकारने टोल माफी देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली. हा प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिकृत निर्णय जाहीर करतील, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. टोल माफी असलेले स्टीकर्स तातडीने उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे पास परतीच्या प्रवासासाठी ग्राह्य धरले जातील. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची वाहने राज्यातील ज्या जिल्ह्यातून येणार तेथील पोलीस ठाणे किंवा प्रादेशिक परिवहन खात्याकडे. पास उपलब्ध करून दिले जामतील.

Comments
Add Comment

मुंबईत आता जलवाहिनी दुरुस्तीच्या काळात होणार नाही पाणीकपात, महापालिकेने असे घेतले हाती काम...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनींमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीच्या काळामध्ये

भारत सागरी सप्ताह २०२५ मध्ये ५५,९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार

भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सहकारातून समृद्धी आणणार: मंत्री अमित शाह

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत दोन मोठ्या नौकांचे सहकारी संस्थांना वितरण मुंबई : सहकाराच्या माध्यमातून

भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी कार्यालय हे मंदिरासमान

भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाचे अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन मुंबई : भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी

केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या छोट्या बच्चूंसाठी गायिका डॉ अनुराधा पौडवाल यांनी दिला असा मदतीचा हात...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक अर्थात केईएम रुग्णालयासाठी आता विख्यात गायिका

एसबीआयकडून मोठ्या प्रमाणावर भरती: ३,५०० अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती

मुंबई : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (SBI) आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि