गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना मिळणार टोल माफी

मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवात दरवर्षी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे यंदाही गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी देण्याचा निर्णय घेण्यात येणार असून याचाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे नगर विकास विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.


२७ ऑगस्ट रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार असून ६ सप्टेंबरला विसर्जन होणार आहे. मुंबई-बंगळुरू महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, अटल सेतू आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील टोलनाक्यांवर ही सवलत दिली जाणार असल्याची माहिती नगरविकास विभागातील अधिकाऱ्याने दिली.


गणेशोत्सवाला काही दिवसांचा अवधी असला तरी सरकारने टोल माफी देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली. हा प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिकृत निर्णय जाहीर करतील, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. टोल माफी असलेले स्टीकर्स तातडीने उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे पास परतीच्या प्रवासासाठी ग्राह्य धरले जातील. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची वाहने राज्यातील ज्या जिल्ह्यातून येणार तेथील पोलीस ठाणे किंवा प्रादेशिक परिवहन खात्याकडे. पास उपलब्ध करून दिले जामतील.

Comments
Add Comment

आरक्षणाची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडणार ?

मुंबई : मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन सुरू केले होते. जरांगेंचे आंदोलन

राज्यात नवीन २ लाख रोजगार संधी, ५० हजार कोटींची गुंतवणूक येणार

महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ सन २०५० पर्यंतचे

राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारण देत बिरेंद्र सराफ

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे आठ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत

या उद्योगपतीने घेतली पहिली टेस्ला !

मुंबई : आयनॉक्स ग्रुपचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन हे भारतातील पहिले उद्योगपती ठरले आहेत, ज्यांनी ‘इंडिया

मुंबईकरांना दिलासा ! मुंबईत ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू – प्रवास होणार स्वस्त आणि सुलभ

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार आहे . शहरात आता इलेक्ट्रिक बाईक