गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना मिळणार टोल माफी

मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवात दरवर्षी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे यंदाही गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी देण्याचा निर्णय घेण्यात येणार असून याचाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे नगर विकास विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.


२७ ऑगस्ट रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार असून ६ सप्टेंबरला विसर्जन होणार आहे. मुंबई-बंगळुरू महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, अटल सेतू आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील टोलनाक्यांवर ही सवलत दिली जाणार असल्याची माहिती नगरविकास विभागातील अधिकाऱ्याने दिली.


गणेशोत्सवाला काही दिवसांचा अवधी असला तरी सरकारने टोल माफी देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली. हा प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिकृत निर्णय जाहीर करतील, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. टोल माफी असलेले स्टीकर्स तातडीने उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे पास परतीच्या प्रवासासाठी ग्राह्य धरले जातील. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची वाहने राज्यातील ज्या जिल्ह्यातून येणार तेथील पोलीस ठाणे किंवा प्रादेशिक परिवहन खात्याकडे. पास उपलब्ध करून दिले जामतील.

Comments
Add Comment

नवख्या सहायक आयुक्तांना प्रशासनाने दिले थेट तोफेच्या तोंडी

संवेदनशील आणि अतिसंवेदनशील विभागात नवख्या सहायक आयुक्तांची नियुक्ती मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधे, औषध दुकानांसाठी आवारात जागा..

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील गरजू आणि गरीब रुग्णांना सुरक्षित आणि परवडणाऱ्या दरातील औषधे उपलब्ध करून देण्याच्या

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना अंतिम, सहा प्रभागांमध्ये झाले सुधारीत बदल

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२५ करिता प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाची

मुंबईतील हरित क्षेत्रे, उद्यानांवर आता बुधवारी राणीबागेत होणार चर्चा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये अधिकाधिक प्रमाणात जैवविविधतेचे संवर्धन व्हावे या

गॅस सिलिंडरच्या स्फोटाच्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने झाले जागे, गॅसच्या सुरक्षित वापरासाठी घेतला 'असा' निर्णय

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत गेल्या काही दिवसात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दुर्दैवी घटना घडल्यानंतर आता

महापालिकेच्या प्रत्येक तक्रारींचे आता त्वरीत निवारण...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत आतापर्यंत आपण कुठल्याही प्रकारची तक्रार केल्यानंतर त्याला प्रतिसाद