पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कसं ठार मारलं ?

श्रीनगर : पहलगाम येथे धर्म विचारुन २६ जणांची हत्या करण्यात आली होती. हे नृशंस हत्याकांड करणारे तीन दहशतवादी सुरक्षा पथकांना चकवत तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ लपून होते. अखेर पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांशी बोलण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर करणे त्यांना भोवले. दहशतवाद्यांनी वापरलेल्या चिनी यंत्रांचे सिग्नल भारताच्या सुरक्षा यंत्रणेने पकडले. यानंतर स्थानिकांच्या मदतीने परिसराची पाहणी करण्यात आली. दहशतवादी नेमके कुठे लपले आहेत याची जास्तीत जास्त अचूक माहिती मिळवण्यात आली. ड्रोनचा वापर करुन परिसराची आकाशातून टेहळणी करण्यात आली.

दहशतवाद्यांनी चकमक होण्याआधीच्या १७ दिवसांत दोन वेळा पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांशी बोलण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर केला होता. अखेर दहशतवाद्यांची नेमकी स्थिती लक्षात आल्यावर सुरक्षा पथकांनी कारवाईची तयारी सुरू केली. श्रीनगरपासून काही किमी. अंतरावर असलेल्या दाचीगामच्या जंगलातील मुलनार येथे महादेव डोंगराजवळ लिडवास हे ठिकाण आहे. याच ठिकाणी दहशतवादी लपले होते. या भागात दीर्घकाळ लपणे शक्य आहे, यामुळे लवकर त्यांचा सुगावा लागला नही. पण सिग्नलच्या मदतीने सुरक्षा पथक दहशतवाद्यांचा माग काढू शकले.घेराव घालून दहशतवाद्यांची कोंडी करण्यात आली होती. पुरते अडचणीत सापडल्याची जाणीव होताच दहशतवाद्यांनी गोळीबार केला. चकमक झाली. या चकमकीत दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांकडून सुरक्षा पथकाने मोठा शस्त्रसाठा आणि चीनी बनावटीची संपर्क यंत्रणा यांची जप्ती केली.

सीमेवर पहारा असल्यामुळे दहशतवाद्यांना परत पाकिस्तानमध्ये जाणे कठीण झाले होते. यामुळे दहशतवादी डोंगराळ भागातील जंगलात लपले होते. ते वारंवार स्वतःची जागा बदलत होते. पाकिस्तानमध्ये संपर्क करण्यासाठी त्यांच्याकडून सॅटेलाइट फोनचा वापर सुरू होता. या फोनमुळेच दहशतवाद्यांना शोधणे सुरक्षा पथकांना सोपे झाले. पण मधल्या काळात काही दिवस दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोन बंद केला होता. ते कोणाशीही फोनद्वारे संपर्क करणे टाळत होते. यामुळे त्यांचा माग काढण्यास वेळ लागला. पण सुरक्षा पथकांची खात्री झाल्यावर इन्फ्रारेड ड्रोनच्या मदतीने जंगलात तपासणी करण्यात आली. उष्णतेच्या मदतीने मानवी अस्तित्वाची माहिती सांगणाऱ्या या ड्रोनने जंगलातील दहशतवाद्यांच्या लपण्याची जागा शोधण्यास सुरक्षा पथकाला मोलाची मदत केली होती. स्थानिकांनी दिलेली माहिती आणि तंत्रज्ञान यांच्या जोरावर दहशतवाद्यांच्या लपण्याचे नेमके ठिकाण शोधून सुरक्षा पथकाने धडक कारवाई केली.
Comments
Add Comment

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.